Delhi News : आजपासून राजधानी दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे होणार उद्घाटन


नवी दिल्ली : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (दि. २१) सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे आणि राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे. सरहद,पुणे या संस्थेच्या वतीने संमेलनाचे आयोजन केले जात आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने ३ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद, मुलाखती असे कार्यक्रम होणार आहेत.



पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीतील विज्ञान भवनात आज (शुक्रवारी) दुपारी ३.३० ला साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उर्वरित सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीमध्ये म्हणजेच तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहेत. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा


डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री अाशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Comments
Add Comment

आंध्र प्रदेशात आता ‘हम दो, हमारे तीन’!

अमरावती (वृत्तसंस्था) : देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू असतानाच, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.

आखातातील युद्धाने एलएनजी महाग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिका व इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे सध्या आखाती देशांमध्ये तणावपूर्ण

राजस्थानमधील डॉ. अनुज अग्निहोत्री पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी टॉपर!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५ चा निकाल शुक्रवारी (६ मार्च) जाहीर

कर्नाटकापाठोपाठ आंध्रातही १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी

बंगळूरु (वृत्तसंस्था) : कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घालण्याचा निर्णय

इंधनाचा मुबलक साठा, तरीही अफवांमुळे पेट्रोल पंपांवर रांगा!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतात पेट्रोल आणि डिझेलची टंचाई

कर्नाटकात लहान मुलांना सोशल मीडिया वापरण्यास बंदी

नवी दिल्ली: कर्नाटकात मुलांसाठी सोशल मीडियावर बंदी घालण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान कर्नाटकचे