Delhi News : आजपासून राजधानी दिल्लीत अ. भा. मराठी साहित्य संमेलन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे होणार उद्घाटन


नवी दिल्ली : ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला शुक्रवारपासून (दि. २१) सुरुवात होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्षा आहेत, तर ज्येष्ठ नेते शरद पवार संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे आणि राजधानी दिल्लीत हे संमेलन होत आहे. सरहद,पुणे या संस्थेच्या वतीने संमेलनाचे आयोजन केले जात आहे. २१ ते २३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत म्हणजेच तालकटोरा स्टेडियममध्ये हे साहित्य संमेलन होत आहे. संमेलनाच्या निमित्ताने ३ दिवस विविध कार्यक्रमांची रेलचेल आहे. यामध्ये कविता, पुस्तक प्रकाशन, चर्चा, परिसंवाद, मुलाखती असे कार्यक्रम होणार आहेत.



पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत दिल्लीतील विज्ञान भवनात आज (शुक्रवारी) दुपारी ३.३० ला साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उर्वरित सर्व कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीमध्ये म्हणजेच तालकटोरा स्टेडियम येथे होणार आहेत. दरम्यान, उद्घाटन सोहळ्यास पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा


डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिकही या साहित्य सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता उद्घाटनाचे दुसरे सत्र संमेलनस्थळी होणार असून याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, मंत्री उदय सामंत, मंत्री अाशीष शेलार यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव