मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक

इंफाळ : मागील २४ तासांत मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपुर, काकचिंग या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या अतिरेक्यांकडून शस्त्रसाठा, संपर्काची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्फोटके, चिथावणी देणारे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या अतिरेक्यांमध्ये निवडक धोकादायक अतिरेक्यांचा समावेश आहे. काही अतिरेक्यांचा शोध मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी ठिकठिकाणी धाड टाकली. याच कारवाईत १७ अतिरेक्यांना गजाआड कण्यात आले.





राज्यपालांचे आवाहन

मणिपूरच्या राज्यपालांनी राज्यातील नागरिकांना सात दिवसांत त्यांच्याकडे असलेली पण परवाना नसलेली अशी शस्त्र जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन जमा करण्याचे आवाहन केले आहे. ही शस्त्र जमा केल्यास पोलीस चौकशी होणार नाही, असेही आश्वासन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी दिले आहे. राज्यपाल अजय कुमार भल्ला हे सरकारी सेवेत असताना आधी केंद्रीय गृह खात्याचे सचिव होते. सचिव पदावरुन निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांची नियुक्ती राज्यपाल या पदावर झाली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून राज्याशी संबंधित निर्णय घेण्याची जबाबदारी राज्यपालांची झाली आहे. आता राज्यपालांनी केलेल्या आवाहनामुळे मणिपूरमधील घटनांकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
Comments
Add Comment

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने

गुप्तचर विभाग RAW चे माजी प्रमुख काय म्हणाले; युद्धात आपण इराणची साथ...

नवी दिल्ली : पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धामुळे जगभरात ऊर्जा संकट गडद होत चाललं आहे. इराण,

Gudi Padwa 2026 : गुढीपाडवा, उगादीसह विविध नववर्ष सणानिमित्त पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील नागरिकांना गुढीपाडवा, उगादी, चेतीचंद, नवरेह आणि सजिबू

२० हजार लोकांना रोजगार देणारा फॉर्म्युला गृहमंत्री अमित शाहांनी सांगितला; पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करून ४२ दिवसांत ३५ कोटी रुपये कमावले

नवी दिल्ली: पाच कोटींची गुंतवणूक, ३५ कोटींची कमाई! आणि याला फार काळ लोटलेला नाही. इतकेच नाही, तर २०,००० हून अधिक