मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक

  46

इंफाळ : मागील २४ तासांत मणिपूरच्या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, बिष्णुपुर, काकचिंग या चार जिल्ह्यांतून १७ अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या अतिरेक्यांकडून शस्त्रसाठा, संपर्काची इलेक्ट्रॉनिक उपकरणे, स्फोटके, चिथावणी देणारे साहित्य आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्या अतिरेक्यांमध्ये निवडक धोकादायक अतिरेक्यांचा समावेश आहे. काही अतिरेक्यांचा शोध मागील अनेक दिवसांपासून सुरू होता. या शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी ठिकठिकाणी धाड टाकली. याच कारवाईत १७ अतिरेक्यांना गजाआड कण्यात आले.





राज्यपालांचे आवाहन

मणिपूरच्या राज्यपालांनी राज्यातील नागरिकांना सात दिवसांत त्यांच्याकडे असलेली पण परवाना नसलेली अशी शस्त्र जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन जमा करण्याचे आवाहन केले आहे. ही शस्त्र जमा केल्यास पोलीस चौकशी होणार नाही, असेही आश्वासन राज्यपाल अजय कुमार भल्ला यांनी दिले आहे. राज्यपाल अजय कुमार भल्ला हे सरकारी सेवेत असताना आधी केंद्रीय गृह खात्याचे सचिव होते. सचिव पदावरुन निवृत्त झाल्यानंतर काही दिवसांतच त्यांची नियुक्ती राज्यपाल या पदावर झाली आहे. मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू झाल्यापासून राज्याशी संबंधित निर्णय घेण्याची जबाबदारी राज्यपालांची झाली आहे. आता राज्यपालांनी केलेल्या आवाहनामुळे मणिपूरमधील घटनांकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले आहे.
Comments
Add Comment

सोनिया गांधी सिमल्याच्या रुग्णालयात

सिमला : काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार सोनिया गांधी यांना सिमला येथील इंदिरा गांधी

Kedarnath Helicopter Video : केदारनाथकडे जाणाऱ्या हेलिकॉप्टरची महामार्गावर आपत्कालीन लँडिंग; व्हिडिओ पाहा

रुद्रप्रयाग : केदारनाथ धामकडे जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरने गुप्तकाशी जि. रुद्रप्रयाग येथे तांत्रिक बिघाडामुळे

Mahua Moitra Ties The Knot : दोन नेते जर्मनीत भेटले अन् गुपचूप विवाहबंधनात अडकले

गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिवांगी वर्मा आणि ७० वर्षीय अभिनेता गोविंद नामदेव यांचा विवाह जोरदार चर्चेत

Gangatok : उत्तर सिक्किममधील हवाई बचाव मोहीम पूर्ण; ७६ सैनिकांना वाचवण्यात यश

गंगटोक : उत्तर सिक्किममधील छातेन येथून सुरु असलेली हवाई बचाव मोहीम आज शनिवारी सकाळी एमआय-१७ हेलिकॉप्टरच्या

काँग्रेस काळजी नक्षलवाद्यांची, भाजपाकडे केली शस्त्रसंधीची मागणी

नवी दिल्ली : भारताला नक्षलवादमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या नेतृत्वात देशव्यापी मोहीम सुरू आहे. सर्व

Longest Tunnel T50 Vande Bharat : जम्मू-श्रीनगर-बारामुला रेल्वेमार्गाचे स्वप्न पूर्ण! T-५० मधून सुसाट धावली वंदे भारत; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला प्रवास

जम्मू-कश्मीर : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शुक्रवारी जम्मू-कश्मीरमधील कटरा (Katra) आणि श्रीनगर (Shrinagar)