SSC Exam : दोनवेळा होणार दहावीची परीक्षा! शिक्षण मंडळाचा निर्णय

मुंबई : नुकतेच दहावी बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर आता लवकरच पुढील शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. अशातच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSC) दहावी बोर्ड (SSC Exam) परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची आता दोनवेळा दहावीची परीक्षा होणार असल्याची माहिती मिळत आहे.



‘सीबीएसई’ने २०२६ पासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेतल्या जाणार असल्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ‘सीबीएसई’चे अधिकारी आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय समिती यांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. यामध्ये दहावी सीबीएससी बोर्डाची दोनदा परीक्षा घेण्याच्या प्रस्तावाची चर्चा करण्यात आली. अद्यापही यावर शिक्कामोर्तब झाले नसले तरीही हा मसुदा पुढील आठवड्यात सोमवारी सार्वजनिक करण्याचे नियोजन केले आहे.


विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान होणाा ताण आणि भीती कमी करण्यासाठी सीबीएससी बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. यामुळेएखादा विद्यार्थी आजारी पडला किंवा काही कारणाने त्याची परीक्षा चुकली तर तो पुन्हा परीक्षेला बसू शकतो. तसेच विद्यार्थ्याला पहिल्या परीक्षेतील गुणांनी समाधान झाले नाही तर, तो पुढच्या वेळी पुन्हा परीक्षेला बसू शकतो. यामध्ये वर्षाच्या दोन्ही बोर्ड परीक्षांमध्ये बसलेल्या विद्यार्थ्यांचे फक्त सर्वोत्तम गुण विचारात घेतले जाणार आहेत. दरम्यान, याबाबतचा मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाईल, त्यावर लोकांकडून सूचना मागवल्या जातील. तसेच ‘सीबीएसई’ मंडळाकडून त्यांच्या २६० संलग्न परदेशी शाळांसाठी जागतिक अभ्यासक्रम सादर केला जाणार आहे. (SSC Exam)

Comments
Add Comment

Maharashtra Rain Update : राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. तापमानाचा पारा अक्षरशः 40 अंशाच्या पुढे

Chhagan Bhujbal : राज्यसभेसाठी माझा आग्रह नाही, पक्ष जो निर्णय घेईल, तो अंतिम असेल- छगन भुजबळ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानसभा निवडणुकीतील

Domstic Violence : 'ओएसडी'कडून पत्नीला बेदम मारहाण; मंत्री अतुल सावे यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई : आपल्या कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी (ओएसडी) विजय कारंडे याच्याविरोधात पत्नीने दाखल केलेली तक्रार

Jalgaon Crime : दारुड्या पतीला पत्नी कंटाळली, शेवटी पतीचा गळा आवळून हत्या केली

Jalgaon Crime : दारू पिऊन सतत त्रास देणाऱ्या पतीला अखेर पत्नीनं संपवलं आहे. ही घटना जळगाव शहरातील कानळदा रस्त्यावरील केसी

Jalna Crime : अंघोळ करताना व्हिडिओ काढायचा; पीडितेवर सलग १० वर्ष अत्याचार जालनामध्ये भयानक प्रकार उघड...

जालना : पुणे, अकोला आणि आता जालना मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची भयानक मालिका सुरु झाली आहे. महाराष्ट्र या घटनांनी

Ashish Shelar on AI : महापालिकेतील निविदा प्रक्रियेत पारदर्शकतेसाठी एआयचा वापर करा- मंत्री अँड आशिष शेलार

मुंबई : महापालिकेची निविदा प्रक्रिया मानवी हस्तक्षेप शुन्य होऊन ती अधिक पारदर्शक होईल, निवेदेतील व्हेरिएशनवर