IND vs BAN: रोहित शर्माच्या ११ हजार धावा पूर्ण, सचिन तेंडुलकरला टाकले मागे

  33

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये भारतीय संघ आपला पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने नवा इतिहास रचला आहे. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपल्या ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत.


रोहितला इथवर पोहोचण्यासाठी १२ धावांची गरज होती. त्याने आपले हे लक्ष्य बांगलदेशविरुद्धच्या सामन्यात सहज पूर्ण केले. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहितने ३६ बॉलवर ४१ धावा केल्या. यात ७ चौकारांचा समावेश होता.



रोहित या खास क्लबमध्ये सामील


रोहित शर्मा १०वा फलंदाज आहे ज्याने एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये ११ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. सोबतच असे करणारा तो चौथा भारताचा फलंदाज आहे. रोहितच्या आधी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहलीने ही कामगिरी केली आहे.


 


रोहित शर्मा एकदिवसीय आंतरराष्ट्रीयमध्ये ११ हजार धावा पूर्ण करणारा दुसरा वेगवान फलंदाज आहे. रोहितने आपल्या २६१ वनडे डावामध्ये ११ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. रोहितने सचिनला याबाबतीत मागे टाकले आहे. त्याने २७६ डावांत ११ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी