Nagpur News : बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : बांगलादेशातील ढाका येथून दुबईला जाणाऱ्या विमानाची बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील प्रवासी नागपुरात खोळंबून बसले असून संबंधित विमान कंपनीकडून त्यांची व्यवस्था करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे नागपुरात उतरवलेले हे विमान दुरुस्तीनंतर आज, गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही यांनी दिली. नागपूर विमानतळाच्या टर्मीनल बिल्डींगजवळ उभे करण्यात आलेल्या या विमानात १२ क्रू मेंबर्स आणि ३९६ प्रवासी असून बांगलादेश एअर लाईन्सचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत होते. यापूर्वी १० नोव्हेंबर २०२४ रोजी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन मिळाल्याने नागपूरहून पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्यात आले होते.



बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले. याशिवाय २० जून २०२४ रोजी यूएस-बांगला एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक बीएस-३४३ या विमानाच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जंसी लॅडिंग करण्यात आले होते. प्रवासादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानुसार, विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. विमानतळ प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळताच विमानाचे सुरक्षितरित्या इमर्जन्सी लॅडिंग झाले. यावेळी प्रवाशांना विमानतळावर ९ तास मुक्काम करावा लागला होता.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,