Nagpur News : बांगलादेशच्या विमानाचे नागपुरात इमर्जन्सी लँडिंग

नागपूर : बांगलादेशातील ढाका येथून दुबईला जाणाऱ्या विमानाची बुधवारी मध्यरात्रीनंतर नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानातील प्रवासी नागपुरात खोळंबून बसले असून संबंधित विमान कंपनीकडून त्यांची व्यवस्था करण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे नागपुरात उतरवलेले हे विमान दुरुस्तीनंतर आज, गुरुवारी रवाना होणार असल्याची माहिती नागपूर विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबीद रूही यांनी दिली. नागपूर विमानतळाच्या टर्मीनल बिल्डींगजवळ उभे करण्यात आलेल्या या विमानात १२ क्रू मेंबर्स आणि ३९६ प्रवासी असून बांगलादेश एअर लाईन्सचे कर्मचारी प्रवाशांच्या सेवेत होते. यापूर्वी १० नोव्हेंबर २०२४ रोजी विमानात बॉम्ब ठेवल्याच्या धमकीचा फोन मिळाल्याने नागपूरहून पश्चिम बंगालच्या कोलकाता येथे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाचे आपत्कालीन लँडींग करण्यात आले होते.



बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान रायपूर विमानतळावर उतरवण्यात आले. याशिवाय २० जून २०२४ रोजी यूएस-बांगला एअरलाइन्सच्या फ्लाइट क्रमांक बीएस-३४३ या विमानाच्या इंजीनमध्ये बिघाड झाल्यामुळे इमर्जंसी लॅडिंग करण्यात आले होते. प्रवासादरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड निर्माण झाल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यानुसार, विमानाच्या इमर्जन्सी लॅडिंगसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्क साधण्यात आला. विमानतळ प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळताच विमानाचे सुरक्षितरित्या इमर्जन्सी लॅडिंग झाले. यावेळी प्रवाशांना विमानतळावर ९ तास मुक्काम करावा लागला होता.

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र