ST News : एसटीतून प्रवास करताना सुट्या पैशांची मिटणार चिंता

अलिबाग  : शासनाची सर्व कार्यालये हळूहळू कॅशलेस होत असताना महाराष्ट्र राज्य परिवहन एसटी महामंडळातही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आता एसटीमधील प्रत्येक वाहकाकडे त्यांच्या जवळील मशीनमध्ये क्यूआर कोडची सोय उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सुट्या पैशांची चिंता आणि त्यावरून होणारे वाद आता होणार नाहीत. एसटी बसमधील वाहकाकडे प्रवास करताना अनेकदा तिकिटाचे पैसे सुट्टे देण्या-घेण्यावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये नेहमीच वादावादी होत असते. त्याचा प्रवाशांना मन:स्ताप होत असतो; परंतु आता प्रवासी एसटीचे तिकीट खरेदी करताना डिजिटल पेमेंट करू शकणार आहेत. जिल्ह्यात ही सुविधा वाहकांच्या तिकीट यंत्रावर करण्यात आली आहे.



या सुविधेस सध्या प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, मोठ्या कटकटीतून सुटका झाल्याचे समाधान प्रवाशांना मिळत आहे. मॉलपासून चहाच्या टपरीपर्यंत अन् भाजी विक्रेत्यांपासून रिक्षाचालकांपर्यंत सध्या सगळ्यांकडेच डिजिटल पेमेंट वॉलेट, यूपीआय असल्यामुळे रोख पैशांची गरज कमी झाली आहे. एसटीचा क्यूआर कोड सर्व पेमेंट वॉलेटला चालणार आहे. त्यामुळे गुगल पे असो वा फोन पे अशा प्रत्येक वॉलेटवरून पैसे दिले जाऊ शकतात.


महामंडळाच्या जेवढ्या बसेस जिल्ह्यात सध्या धावताहेत, त्या प्रत्येक बसमध्ये क्यूआर कोडची सुविधा दिली जात आहे. त्याचा लाभही सध्या प्रवाशांकडून घेतला जात आहे. मात्र बसच्या आरक्षणासाठी अद्याप यूपीआय पेमेंटची सोय उपलब्ध नाही. डेबिट व क्रेडिट कार्डचा वापरही दुसऱ्या टप्प्यात केला जाणार आहे. त्यामुळे एसटीची पेमेंट प्रक्रिया सुलभ पद्धतीने होत आहे. एसटी बसमध्ये पूर्वी चिल्लर पैशावरून प्रवासी व वाहकांत वाद होत असत. बऱ्याचदा पैसे नंतर देतो म्हणून प्रवाशांना सांगितले जात होते. आता चिल्लर पैसे बाळगण्याची चिंता मिटली आहे.

Comments
Add Comment

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .

श्रीराम लाईफ इन्शुरन्समधून पिरामल फायनान्स बाहेर पडणार 'या' कारणामुळे,६०० कोटीचा एकूण सौदा जाहीर

मुंबई: पिरामल फायनान्स लिमिटेड (Piramal Finance Limited) कंपनीने श्रीराम लाईफ इन्शुरन्स कंपनीतील आपला संपूर्ण १४.७२% हिस्सा

या वर्षीचा ख्रिसमस ठरतोय खास का ? जाणून घेऊया कारण

अंकांचा अनोखा योग जुळून आला आहे .तारीख बघा २५ /१२/२५ आहे ना आश्चर्यकारक डिसेंबर महिना सुरु झाला की सर्वांना आतुरता

उच्च रक्तदाबाने हैराण झाला आहात? मग रोज खा सुकं खोबर

रोज जेवण बनवताना वेगवेगळ्या पदार्थांचा वापर केला जातो.त्यामध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ म्हणजे