रेशन दुकानातून मिळणारा गहू होणार कमी

मुंबई : राज्य शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने स्वस्त धान्य दुकान अर्थात रेशन दुकानातून वाटप करण्यात येणाऱ्या गव्हाचे प्रमाण कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गरीब लाभार्थ्यांना आता गहू कमी मिळणार असून सर्वसामान्यांच्या ताटातून चपाती कमी होऊ शकते.



शासनाने लाभार्थ्यांना तांदुळाचे वाटप मात्र वाढवून दिले आहे. सदर बदल मार्च २०२५ पासून लागू होणार असून लाभार्थ्यांना धान्याचे वाटप मोफत करण्यात येणार आहे. अंत्योदय कार्डधारकांना एका कार्डामागे १५ किलो गहू व २० किलो तांदूळ तर प्राधान्य गटातील प्रत्येक लाभार्थ्याला दोन किलो गहू व तीन किलो तांदुळाचे वाटप करण्यात येते.



परंतु त्यामध्ये आता शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने बदल केला आहे. लाभार्थ्यांच्या हिस्स्यातील गव्हाला कात्री लावण्यात आली असून त्याबदल्यात लाभार्थ्यांना तांदुळ मिळेल.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.

Raj Thackeray : राज ठाकरेंचे मतदारांना पत्र, पत्रातील भाषेवरुन भाजपची राज ठाकरेंवर टीका

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भाजपचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध

सांगलीत भाजप बहूमताच्या उंबरठ्यावर अडखळली

एका जागेसाठी देणार शिवसेनेला उपमहापौर मुंबई : महायुतीत फाटाफूट झालेली, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची

परभणीत मशाल पेटली, नांडेमध्ये कमळ फुलले

मुंबई : महापालिका निवडणुकीत सर्वत्र सत्ताधारी पक्षांचा बोलबाला दिसत असताना येथे मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे

मुंबई महापालिका निवडणूक निकालात काय घडले?

नार्वेकरांनी तिन्ही गड राखले मुंबई : कुलाबा विधानसभेत भाजपच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर