म्हाडात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार

म्हाडाच्या नागरी सुविधा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात, एप्रिलपासून होणार कार्यान्वित


मुंबई : म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरी सुविधा केंद्राचे काम आता अंतिम टप्प्यात असून एप्रिलपासून हा कक्ष कार्यान्वित होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. या कक्षामुळे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार आहेत.


म्हाडा मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ, गिरणी कामगार विभाग, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. विविध कामानिमित्त दिवसाला सुमारे चार ते पाच हजार नागरिक या कार्यालयाला भेट देतात.


एखाद्या विभागाशी संबंधित आपली तक्रार असल्यास तो विभाग शोधण्यापासून ते तक्रार दाखल केल्यानंतर त्या तक्रारीचा फॉलोअप घेण्यासाठी नागरिकांना वारंवार म्हाडा मुख्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे डिसेंबरपासून म्हाडा मुख्यालयातील गेट क्रमांक ४ येथे या केंद्राच्या उभारणीला सुरुवात झाली आहे. नागरी सुविधा केंद्राचे काम मार्चच्या अखेरीस पूर्ण होऊन एप्रिलपासून हा कक्ष सुरु होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.


नागरिकांचे तक्रार अर्ज, टपाल येथे या केंद्रावर एकाच ठिकाणी जमा केले जाणार आहेत. त्यानंतर आलेल्या अर्जांचे वर्गीकरण करून ते अर्ज संबंधित विभागाला पाठवण्यात येईल. त्या अर्जाचा पाठपुरावा देखील नागरिकांना याच केंद्रावर घेता येणार आहे. त्यामुळे नागरिकांची पायपीट थांबणार आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव मुलुंड पश्चिमेतील उड्डाणपूल प्रकल्पाला गती, मुंबई मेट्रो ४च्या खालून जाणार पूल

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : तानसा जलवाहिनी ते नाहूर रेल्वे पूल येथपर्यंतचा १.८९ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल

महापालिकेच्या आपला दवाखान्यामध्येही मुख कर्करोगाची तपासणी

गर्भाशय मुख आणि स्तन कर्करोगाचे दवाखान्यांसह प्रसुतीगृहांमध्ये तपासणी शिबीर मुंबई (विशेष प्रतिनिधी)

गोरेगावात लिफ्टमध्ये हायड्रोजन फुग्यांचा स्फोट; तीन जण थोडक्यात बचावले

मुंबई : मुंबईतील गोरेगाव परिसरात हायड्रोजन गॅस भरलेल्या फुग्यांमुळे मोठा धोका निर्माण झाल्याची घटना समोर आली

भारतीय कृषी क्षेत्रावर तसा विपरीत परिणाम होऊ नये

अंदाजपत्रकातून विकासाला गती येण्यासाठी आणखी काही ठोस पावलांची अपेक्षा बारामती : केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत

शक्तीपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

राज्य सरकारचा निर्णय; कागल आणि हातकणंगलेचा भाग वगळला मुंबई : राज्यातील साडेतीन शक्तीपीठांना जोडणाऱ्या

Pune Mumbai Expressway News : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गॅस गळतीमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला, पहाटेपर्यंत बचावकार्य सुरू

मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपासून सुरू झालेला वाहतुकीचा खोळंबा तब्बल १२