Shivjayanti 2025 : 'जय शिवाजी.. जय भारत'च्या जयघोषाने दुमदुमले ठाणे शहर

  57

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९५ जयंतीनिमित्त ठाणे शहरातून काढण्यात आलेल्या जयशिवाजी जय भारत या ६ कि.मी अंतराच्या पदयात्रेस ठाणेकर नागरिकांसह शासकीय अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जय शिवाजी जय भारत अशा घोषणा देत संपूर्ण पदयात्रेचा परिसर हा दुमदुमून गेला. चार हजारांहून अधिक नागरिक या यात्रेत सहभागी झाले होते.


यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त २ प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, जी.जी. गोदेपुरे, मनीष जोशी, सचिन सांगळे, मधुकर बोडके, शंकर पाटोळे, दिनेश तायडे प्र. उपआयुक्त मीनल पालांडे, अग्निशमन दल प्रमुख गिरीष झळके, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.


भारत सरकार, युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे शहरातून सकाळी ७.३०वा. शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावरुन या पदयात्रेची सुरूवात करण्यात आली. तेथून मारोतराव शिंदे तरणतलाव, दत्त मंदिर घाट, प्रभात सिनेमा‍ सिग्नल, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, रंगो बापूजी गुप्ते चौक, टेंभीनाका, कोर्टनाका, सेंट्रल मैदान, ठाणे जिल्हा कारागृह, जी.पी.ओ, सिव्हील हॉस्प‍िटल, सिग्नाँग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खोपट सिग्नल, अल्मेडा चौक, महापालिका मुख्यालय, पाचपाखाडी प्रशांत कॉर्नर, आराधना टॉकीज चौक पु.ना. गाडगीळ चौक, तलावपाळी येथून पुन्हा शिवसमर्थ शाळा पटांगण येथे ही पदयात्रा विसर्जित करण्यात आली. या पदयात्रेत सर्व शासकीय आस्थापनांचे अधिकारी/ कर्मचारी, शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, एन.एस.एस, सामाजिक संस्था, ट्रस्टमधील सर्व व्यक्ती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पटांगणावर शालेय विद्यार्थ्यांनी मैदानी खेळांची ‍प्रात्याक्षिके सादर केली.



तद्नंतर विविध क्रीडाप्रकारात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे आदी मान्यवरांच्या बॅडमिंटनपटू व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त श्रीकांत वाड, कबड्डी या क्रीडाप्रकारात अर्जुन पुरस्कारप्राप्त करणारे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कबड्डी मध्ये शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणाऱ्या महापालिकेच्या प्र. उपआयुक्त मीनल पालांडे, अद्वैता मांगले, विदयमान बॅडमिंटनपटू दीप सांभीया, मालविका बनसोड, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी निलेश साळुंके, रिदमिक ‍जिम्नॅस्टिकपटू व आंतरराष्ट्रीय पंच पुजा सुर्वे, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थी श्रध्दा तळेकर, वेटलिफ्टींग खेळाडू मधुरा सिंहासने, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांना सन्मानित करण्यात आला.



*आजचा दिवस वीरश्रीचा : जिल्हाधिकारी अशोक शिनगारे*


छत्रपती शिवाजी महाराज, जय शिवाजी जय भवानी हे शब्द उच्चारताच प्रत्येकामध्ये वीरश्री संचारते. आज छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५वी जयंती मोठ्या उत्साहात आपण सर्वांनी साजरी केली. आजचा दिवस हा वीरश्रीने भारलेला असून ही प्रेरणा आपल्याला सतत उर्जा देणारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य कर्तृत्वाचा आलेख डोळ्यांसमोर आला की आपल्याला स्फुरण चढते त्यामुळे ‍शिवजयंतीच्या दिवसाला वेगळे महत्व असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी यावेळी केले. शिवछत्रपतींचा इतिहास हा नव्या पिढीपर्यंत दिमाखात पोहचावा, यासाठी यावर्षी पदयात्रा काढण्यात आली असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच ठाणे महापालिकेने या कार्यक्रमाचे आयोजन भव्यदिव्य प्रमाणात केल्याबद्दल महापालिकेचे कौतुक जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी केले.

Comments
Add Comment

Crizac Limited IPO: उद्यापासून Crizac आयपीओ बाजारात दाखल होणार Price Band २३३ ते २४५ रूपये निश्चित!

प्रतिनिधी: उद्यापासून क्रिझॅक लिमिटेड (Crizac Limited) कंपनीचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी बाजारात दाखल होत आहे. ८६० कोटींचा

महाराष्ट्रात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट पोस्टपेड मीटर

मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने दिलेल्या माहितीनुसार राज्यात स्मार्ट प्रीपेड नाही स्मार्ट

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र

PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेत आता मिळणार इतके व्याज, सरकारने केली घोषणा

नवी दिल्ली: भारत सरकारने स्मॉल सेव्हिंग स्कीम्सवरील व्याजदर कायम राखण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेत आतापर्यंत