ग्रामीण भागात बिबट्याची दहशत कायम

कोंढवडला हिवाळे वस्तीवर बिबट्याचा धुमाकूळ


राहुरी : तालुक्यातील ग्रामीण भागात आजही बिबट्याची दहशत कायम असून, सायंकाळ व रात्रीच्या वेळी कोंढवड येथील हिवाळे वस्तीवर हल्ला करून एका पाळीव कुत्र्याचा फडशा पाडला तर अन्य पाळीव पशु त्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावले. वनविभागाने पर्याय काढण्याची गरज असल्याची जनतेतून मागणी होत आहे.


तालुक्यातील मुळा नदीलगत असलेल्या कोंढवड शिवारातील रहिवासी असलेल्या रवींद्र (पप्पू )हिवाळे यांच्या वस्तीवर सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातला. या बिबट्याने हिवाळे यांच्या गायांच्या गोठ्यातील शेळ्यासाठी स्वतंत्र बंदिस्त असलेल्या शेळ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बिबट्याचा तो प्रयत्न असफल ठरला. त्यानंतर बिबट्याने आपला मोर्चा हिवाळे यांच्या बांधून ठेवलेल्या कुत्र्याकडे वळविला. शेळ्यांचा ओरडण्याचा व कुत्र्याच्या किंचाळण्याचा आवाज आल्याने हिवाळे घराबाहेर आले. त्यावेळी बिबट्याने कुत्र्याच्या नरडीची घोट घेतला होता.



हिवाळे यांनी बिबट्याला पाहून आरडाओरड केला असता बिबट्याने शेजारील शेतात धुम ठोकली.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून कोंढवड परिसरात बिबट्यांनी चांगलाच धुमाकूळ घालून अनेक शेतकर्‍यांच्या कालवडी, शेळ्या, बोकड व पाळिव कुत्रे फस्त केले आहे. तसेच काही ग्रामस्थ व शेतकर्‍यांवर हल्ले करून त्यांना जखमी सुध्दा केले आहे. परिसरात बिबट्यांची संख्या वाढत असल्याने त्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा ही लावला. मात्र, हा पिंजरा गेल्या दोन महिन्यापासून आहे त्याच ठिकाणी तसाच पडून आहे. या पिंजर्‍याकडे अद्याप एक ही बिबट्या फिरकला नसून गावातील ज्या परिसरात बिबट्यांचा कायम वावर आहेे, अशा ठिकाणी हा पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.


मानोरी शिवारात चार दिवसापूर्वीच भरदिवसा गिन्नी गवत कापत असलेल्या शेतकर्यावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला चढवत गंभीर जखमी केले होते. तर वरवंडीतील चिमुकलीवरचा हल्ला ताजा असताना वाढत्या बिबट्यांच्या संख्येने व वाढत्या वावराने शेतकरी, शेतमजूरांसह जनता त्रस्त झाली आहे. यावर वनविभागाने प्रशासनाने तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे.अन्यथा ग्रामीण जनतेवर 'तेल गेल न तुपही गेलं' हाती धुपाटण घेण्याची वेळ येणार असल्याच्या प्रतिक्रिया जनमाणसांमधून व्यक्त होत आहेत.

Comments
Add Comment

TET exam : टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक

टीईटी परीक्षेत सीसीटीव्हीमध्ये चेहरा दिसणे बंधनकारक बुरखा, दुपट्टा किंवा ओढणीला बंदी नाही- राज्य परीक्षा

Vilas Ghule : विलास घुले हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडेंचा सवाल; निष्पक्ष तपासाची मागणी

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यातील विलास घुले (Vilas Ghule) हत्या प्रकरणावरून (Murder) माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे

Monsoon Update : जून महिन्यात पाऊस पडणार नाही ; या तारखेपासून कोसळणार मुसळधार पाऊस

महाराष्ट्र : महाराष्ट्रामध्ये काही भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. २३ आणि २५ जूनला मुंबईसह इतर शहरात मुसळधार

Ketan Agarwal Murder Case: "म्हणून मी त्याला लोहगडावरून खाली ढकललं..." सियाने पोलिसांसमोर सर्वचं सांगितलं

केतनच्या हत्येमागचं सर्वात भयंकर कारण आलं समोर Ketan Agarwal Murder Case : पुणे : पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवाल (Ketan Agarwal Murder)

आषाढी वारीसाठी रेल्वेची खास भेट; पंढरपूरसाठी धावणार विशेष गाड्या, जाणून घ्या वेळापत्रक

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली

Maharashtra Infrastructure : मुंबई आणि नागपूरसाठी मोठा निर्णय; दोन महत्त्वाच्या वाहतूक प्रकल्पांना राज्य सरकारची मंजुरी

राज्यातील वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान आणि सुलभ करण्यासाठी राज्य सरकारने दोन महत्त्वाच्या पायाभूत सुविधा