Shivjayanti 2025 : धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीत तोफेचा स्फोट, दोघे जखमी

  100

धाराशिव : संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा पार पडत असताना धाराशिवमध्ये एक दुर्घटना घडली आहे.धाराशिव जिल्ह्यातील पारा येथे काढण्यात आलेल्या सार्वजनिक शिवजयंती रॅलीत फटाके फोडताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे. पारा गावामध्ये सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिवरणुकीत फटाके फोडण्यासोबतच दगडी तोफ देखील होती. या तोफेतून आवाजाची दारू उडवताना मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षता संतोष भराटे (१२, रा. पारा) आणि महेंद्र किंचन गवळी (३५, रा. पारा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.



महेंद्र किंचन गवळी याच्या गळ्याला जखम झाली आहे तर क्षता संतोष भराटे हिचा गाल भाजला आहे. धाराशिव च्या शासकीय रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या आवाजाने मिवरणुकीत गोंधळ उडाला होता.तोफेचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही