Shivjayanti 2025 : धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीत तोफेचा स्फोट, दोघे जखमी

धाराशिव : संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा पार पडत असताना धाराशिवमध्ये एक दुर्घटना घडली आहे.धाराशिव जिल्ह्यातील पारा येथे काढण्यात आलेल्या सार्वजनिक शिवजयंती रॅलीत फटाके फोडताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे. पारा गावामध्ये सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिवरणुकीत फटाके फोडण्यासोबतच दगडी तोफ देखील होती. या तोफेतून आवाजाची दारू उडवताना मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षता संतोष भराटे (१२, रा. पारा) आणि महेंद्र किंचन गवळी (३५, रा. पारा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.



महेंद्र किंचन गवळी याच्या गळ्याला जखम झाली आहे तर क्षता संतोष भराटे हिचा गाल भाजला आहे. धाराशिव च्या शासकीय रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या आवाजाने मिवरणुकीत गोंधळ उडाला होता.तोफेचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत