Shivjayanti 2025 : धाराशिवमध्ये शिवजयंती रॅलीत तोफेचा स्फोट, दोघे जखमी

धाराशिव : संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात शिवजयंतीचा सोहळा पार पडत असताना धाराशिवमध्ये एक दुर्घटना घडली आहे.धाराशिव जिल्ह्यातील पारा येथे काढण्यात आलेल्या सार्वजनिक शिवजयंती रॅलीत फटाके फोडताना स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले असून दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारा गावामध्ये ही दुर्घटना घडली आहे. पारा गावामध्ये सार्वजनिक शिवजयंती समितीच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. शिवजयंती निमित्ताने काढण्यात आलेल्या मिवरणुकीत फटाके फोडण्यासोबतच दगडी तोफ देखील होती. या तोफेतून आवाजाची दारू उडवताना मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. यामध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षता संतोष भराटे (१२, रा. पारा) आणि महेंद्र किंचन गवळी (३५, रा. पारा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.



महेंद्र किंचन गवळी याच्या गळ्याला जखम झाली आहे तर क्षता संतोष भराटे हिचा गाल भाजला आहे. धाराशिव च्या शासकीय रुग्णालयात दोघांवरही उपचार सुरू आहेत. स्फोटाच्या आवाजाने मिवरणुकीत गोंधळ उडाला होता.तोफेचा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे अद्याप कळू शकलेले नाही. पोलीस या दुर्घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल