फुटबॉल सामन्यादरम्यान दुर्घटना, आतिषबाजीमुळे मैदानात पसरली आग, ३० जण होरपळले

तिरूअनंतपुरम: केरळमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. मल्लपुरम जिल्ह्याच्या अरिकोड शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान ३० हून अधिक प्रेक्षक आगीमुळे होरपळले. सामन्याच्या सुरू होण्याच्या आधी ही दुर्घटना घडली. खरंतर, सामन्याच्या आधी आयोजकांनी येथे आतिषबाजीचा मोठा कार्यक्रम ठेवला होता. या दरम्यान, फटाके अनियंत्रित झाल्याने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये जाऊन फुटले. अशातच एकच गोंधळ झाला.


दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये ३ जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील अरिकोडजवळ एका फुटबॉल सामन्यादरम्यान अपघात झाला. यात आतषबाजीमुळे ३० जण जखमी झाले. फुटबॉल सामना सुरू होण्याआधी फटाके फोडण्यात आले. हे फटाके प्रेक्षकांमध्ये जाऊन फुटले. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला

General Upendra Dwivedi : जनरल उपेंद्र द्विवेदी निवृत्त; जनरल धीरज सेठ नवे सैन्य प्रमुख

नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी मंगळवारी आपल्या पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीपूर्वी

Supreme Court : 'त्या' प्रकरणात आसारामला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा नाहीच; अंतरिम जामीनावर तत्काळ सुनावणीस नकार

Supreme Court : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसारामला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का

Assam Rain : ईशान्य भारतात पावसाचा कहर! आसाममध्ये महापूराने रेल्वे पूल वाहून गेला; २२ हजार नागरिक बेघर, १२ जिल्ह्यांचा संपर्क तुटला

- ६० वर्षांपूर्वीचा रेल्वे पूल कोसळला; रेल्वे वाहतुकीवर परिणाम गुवाहाटी : ईशान्य भारतात मुसळधार पावसाने थैमान

NEET Case : नीटप्रकरणी १० आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत ११ जुलैपर्यंत वाढ

नवी दिल्ली: नीट परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू