कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू पितात? घ्या जाणून...

मुंबई: केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समजते की भारतातील दर पाचवा पुरुष म्हणजेच देशातील २२.४ टक्के पुरुष दारूचे शौकीन आहेत. मात्र चांगली बाब ही की दारू पिणाऱ्या पुरुषांच्या टक्केवारीत घट झाली आहे. २०१५-१६मध्ये हा आकडा २९.२ टक्के होता. ही टक्केवारी आता कमी झाली आहे. दरम्यान, काही राज्ये सरासरीच्या पुढे गेले आहेत.


दारू पिणाऱ्या पुरुषांमध्ये ५९.१ टक्क्यांसह गोवा सगळ्यात आघाडीवर आहे. यानंतर अरूणाचल प्रदेश(५६.६ टक्के), तेलंगणा(५० टक्के), झारखंड (४०.४ टक्के), सिक्कीम (३६.३ टक्के), छत्तीसगड(३५.९ टक्के), तामिळनाडू (३२.८ टक्के), उत्तराखंड (३२.१ टक्के), आंध्र प्रदेश(३१.२ टक्के), पंजाब (२७.५ टक्के), आसाम (२६.५ टक्के), केरळ(२६ टक्के) आणि पश्चिम बंगाल(२५.७ टक्के) आहे.


बिहारमध्ये २०१६मध्ये दारूबंदी लागू झाली होती मात्र आकडेवारीनुसार तेथे अद्यापही दारू प्यायली जाते. २०१५-१६मध्ये बिहारमध्ये दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या २८.९ टक्के होती. आजही १७ टक्के पुरूष दारू पितात.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६च्या आकडेवारीनुसार भारतात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या दारू सेवनाची टक्केवारी अनुक्रमे १.२ टक्के आणि २९.२ टक्के होती. २०१९-२१ मध्ये ही टक्केवारी महिलांसाठी ०.७ ट्क्के आणि पुरुषांसाठी २२.४ टक्क्यांपर्यंत घसरली.

Comments
Add Comment

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Hindu religion : धर्मांतरित हिंदूंच्या मनात जर खरी श्रद्धा असेल, तर त्यांना मंदिरात प्रवेश करण्याचा आणि पूजा करण्याचा अधिकार

नवी दिल्ली : जर एखादी व्यक्ती जन्माने हिंदू (Hindu) नसतानाही तिला मंदिरात प्रवेश नाकारला जाऊ शकतो का? याबाबत ती

थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

अरुणाचल प्रदेशात ढगफुटी आणि भूस्खलन; १४ गावांतील ३१०० हून अधिक नागरिक बाधित

इटानगर : अरुणाचल प्रदेशातील लोअर सियांग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या ढगफुटी आणि भूस्खलनामुळे

El Nino: चिंतेची बातमी, १९०१ नंतर भारतात सर्वात कमी पाऊस असलेला पाचवा जून

नवी दिल्ली : भारतात १९०१ पासूनच्या नोंदीनुसार यावर्षी जून महिन्यात पाचव्या क्रमांकाचा सर्वात कमी पाऊस झाला आहे.

Haldia Refinery Fire : हल्दिया रिफायनरीच्या पाइपलाइनला आग; १५ कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा पाइपलाइनला