कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू पितात? घ्या जाणून...

मुंबई: केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समजते की भारतातील दर पाचवा पुरुष म्हणजेच देशातील २२.४ टक्के पुरुष दारूचे शौकीन आहेत. मात्र चांगली बाब ही की दारू पिणाऱ्या पुरुषांच्या टक्केवारीत घट झाली आहे. २०१५-१६मध्ये हा आकडा २९.२ टक्के होता. ही टक्केवारी आता कमी झाली आहे. दरम्यान, काही राज्ये सरासरीच्या पुढे गेले आहेत.


दारू पिणाऱ्या पुरुषांमध्ये ५९.१ टक्क्यांसह गोवा सगळ्यात आघाडीवर आहे. यानंतर अरूणाचल प्रदेश(५६.६ टक्के), तेलंगणा(५० टक्के), झारखंड (४०.४ टक्के), सिक्कीम (३६.३ टक्के), छत्तीसगड(३५.९ टक्के), तामिळनाडू (३२.८ टक्के), उत्तराखंड (३२.१ टक्के), आंध्र प्रदेश(३१.२ टक्के), पंजाब (२७.५ टक्के), आसाम (२६.५ टक्के), केरळ(२६ टक्के) आणि पश्चिम बंगाल(२५.७ टक्के) आहे.


बिहारमध्ये २०१६मध्ये दारूबंदी लागू झाली होती मात्र आकडेवारीनुसार तेथे अद्यापही दारू प्यायली जाते. २०१५-१६मध्ये बिहारमध्ये दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या २८.९ टक्के होती. आजही १७ टक्के पुरूष दारू पितात.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६च्या आकडेवारीनुसार भारतात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या दारू सेवनाची टक्केवारी अनुक्रमे १.२ टक्के आणि २९.२ टक्के होती. २०१९-२१ मध्ये ही टक्केवारी महिलांसाठी ०.७ ट्क्के आणि पुरुषांसाठी २२.४ टक्क्यांपर्यंत घसरली.

Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना