कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू पितात? घ्या जाणून...

  77

मुंबई: केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार समजते की भारतातील दर पाचवा पुरुष म्हणजेच देशातील २२.४ टक्के पुरुष दारूचे शौकीन आहेत. मात्र चांगली बाब ही की दारू पिणाऱ्या पुरुषांच्या टक्केवारीत घट झाली आहे. २०१५-१६मध्ये हा आकडा २९.२ टक्के होता. ही टक्केवारी आता कमी झाली आहे. दरम्यान, काही राज्ये सरासरीच्या पुढे गेले आहेत.


दारू पिणाऱ्या पुरुषांमध्ये ५९.१ टक्क्यांसह गोवा सगळ्यात आघाडीवर आहे. यानंतर अरूणाचल प्रदेश(५६.६ टक्के), तेलंगणा(५० टक्के), झारखंड (४०.४ टक्के), सिक्कीम (३६.३ टक्के), छत्तीसगड(३५.९ टक्के), तामिळनाडू (३२.८ टक्के), उत्तराखंड (३२.१ टक्के), आंध्र प्रदेश(३१.२ टक्के), पंजाब (२७.५ टक्के), आसाम (२६.५ टक्के), केरळ(२६ टक्के) आणि पश्चिम बंगाल(२५.७ टक्के) आहे.


बिहारमध्ये २०१६मध्ये दारूबंदी लागू झाली होती मात्र आकडेवारीनुसार तेथे अद्यापही दारू प्यायली जाते. २०१५-१६मध्ये बिहारमध्ये दारू पिणाऱ्या पुरुषांची संख्या २८.९ टक्के होती. आजही १७ टक्के पुरूष दारू पितात.


आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५-१६च्या आकडेवारीनुसार भारतात १५ ते ४९ वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांच्या दारू सेवनाची टक्केवारी अनुक्रमे १.२ टक्के आणि २९.२ टक्के होती. २०१९-२१ मध्ये ही टक्केवारी महिलांसाठी ०.७ ट्क्के आणि पुरुषांसाठी २२.४ टक्क्यांपर्यंत घसरली.

Comments
Add Comment

गंभीर गुन्ह्याप्रकरणी तुरुंगात गेल्यास पीएम सीएमना हटवणाऱ्या विधेयकाप्रकरणी विरोधकांचा रडीचा डाव

नवी दिल्ली : गंभीर गुन्ह्याप्रकरणी किमान ३० दिवस तुरुंगात घालवले किंवा तशी कोठडी देण्यात आली तर संबंधित मंत्री

रस्ते अपघातामध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू, सीसीटीव्हीमध्ये दुर्घटना कैद

जम्मू आणि काश्मीर: रस्ते अपघातामध्ये भारतीय क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या अपघाताचं

गगनयान मोहिमेसाठीची इस्रोची एअर ड्रॉप चाचणी यशस्वी

नवी दिल्ली : गगनयान मोहिमेसाठी इस्रोने यशस्वी एअर ड्रॉप चाचणी घेतली. ही पहिली एअर ड्रॉप चाचणी होती, जी पूर्ण

भारताच्या स्वदेशी हवाई संरक्षण यंत्रणांची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली : डीआरडीओने भारताच्या एकात्मिक हवाई संरक्षण यंत्रणेसाठी शुक्रवारी २३ ऑगस्ट रोजी यशस्वी चाचण्या

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या