PM Narendra Modi : कतारशी संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी तोडले सर्व 'प्रोटोकॉल'!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व प्रोटोकॉल तोडून सोमवारी संध्याकाळी (१७ फेब्रुवारी) दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर स्वतः जाऊन कतारचे अमीर यांचे स्वागत केले. भारत आणि कतार यांच्यातील संबंध मजबूत करण्यासाठी मोदींकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत.


कतारचे अमीर अल थानी हे २ दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. यात ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा करतील आणि दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार समंत केले जातील. परराष्ट्र खात्यानुसार, कतारचे अमीर यांचं मंगळवारी (१८ फेब्रुवारी )राष्ट्रपती भवन परिसरात औपचारिक स्वागत केले जाईल. त्यानंतर दिल्लीच्या हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदींसोबत त्यांची बैठक होईल. कतारचे अमीर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत.



पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणावरून अमीर अल थानी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आलेत. याआधी ते २०१५ साली दिल्ली दौऱ्यावर आले होते. भारत आणि कतार यांच्यात अलीकडच्या काळात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, औद्योगिक, संस्कृती यासह विविध क्षेत्रात मजबूत संबंध तयार झाले आहेत. यावेळीही कतारचे अमीर अल थानी यांच्या दौऱ्यावर महत्त्वाच्या करारावर शिक्कामोर्तब होऊ शकते.


३ जून १९८० साली कतारच्या दोहा इथं जन्मलेले तमीम बिन अल थानी यांचे वडील शेख हमद बिन खलिफा अल थानी यांच्यानंतर २५ जून २०१३ साली कतारचे अमीर बनले होते. ब्रिटनमध्ये शिक्षण पूर्ण करून तमीम बिन हमद यांनी कतार सैन्यात त्यांची सेवा दिली. ४४ वर्षीय तमीम ना केवळ कतारमधील सर्वात युवा श्रीमंत आहेत तर जगातील सर्वात युवा राष्ट्राध्यक्षांमध्येही त्यांचं नाव घेतले जाते. कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी जगातील ९ वे सर्वात श्रीमंत शासक आहेत. त्यांची संपत्ती जवळपास ३३५ अब्ज डॉलर्स इतकी आहे.

Comments
Add Comment

Jaipur Bus Accident : काळ आला पण वेळ...हाय टेंशन तारेच्या स्पर्शाने बसला भीषण आग, १२ कामगार होरपळले; दोघांचा दुर्दैवी मृत्यू

जयपूर : राजस्थानमधील जयपूर (Jaipur)  जिल्ह्यात कामगारांना घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला आग लागून भीषण दुर्घटना

भारताने युद्धासारख्या परिस्थितीसाठी सज्ज राहावे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

नवी दिल्ली : मे महिन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या चार दिवसांच्या लष्करी संघर्षानंतर भारताने युद्धासारख्या

भारतातील तरुणांच्या लोकसंख्येत झपाट्याने घट

नवी दिल्ली : देशाच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाचा अहवाल

Uttar Pradesh Crime : अक्षरशः क्रूरतेचा कळस, १२ वर्षीय मुलाचा प्रायव्हेट पार्ट कापून गळा चिरला अन् नंतर...थरकाप उडवणारी हत्या

झांसी : उत्तर प्रदेशातील झांसी जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि क्रूर हत्येची घटना समोर आली आहे. बबीना पोलीस

बँकेचा हप्ता न भरल्यास थेट एआय कॉल करणार

नवी दिल्ली : भारतीय बँकिंगच्या इतिहासात पहिल्यांदाच थकीत कर्जाचे प्रमाण ०.५ टक्के किंवा त्याहूनही खाली

तीव्र प्रकाशात झोपणाऱ्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका तब्बल ५६ टक्क्यांनी अधिक

नवी दिल्ली : रात्री झोपताना खोलीत असणारा तेजस्वी प्रकाश केवळ झोपेवरच नव्हे, तर हृदयाच्या आरोग्यावरही गंभीर