Mumbai News : मुंबईचं रुपडं पालटणार! एमएमआरडीएने आखला मास्टर प्लॅन

मुंबई : स्मार्ट सिटी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहरात सातत्याने नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यात येतात. अशातच आता मुंबई महानगर प्रदेशाला विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यामुळे मुंबई सारख्या महागड्या शहरात कामासाठी आलेल्या लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. (Mumbai News)



एमएमआरडीएने गृहनिर्माण क्षेत्र विकसित करण्याची योजना आखली आहे. यामध्ये सिंगापूरप्रमाणेच मुंबई विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरमध्ये बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील ३० ते ४० टक्के घरे भाड्याने घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या घरांचे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, ही घरे मेट्रो आणि रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या परवडणारी घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.



नागरिकांच्या सुविधेसाठी उभारणार सिंगापूरसारखी घरे


मुंबई हे जगातील सर्वात महागडे शहर आहे. मुंबईतील नागरिक आपल्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम ही घराच्या भाड्यासाठी खर्च करतात. इतर शहरातील लोक फक्त ३० ते ३५ टक्के रक्कम घराच्या भाड्यासाठी वापरली जाते. त्यामुळेच एमएमआरच्या विकासासाठी रेंटल हाउसिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन सिंगापूरसारख्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. (Mumbai News)

Comments
Add Comment

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केईएम रुग्णालयाला दिले व्हेंटिलेटर दान!

मुंबई: केईएम रुग्णालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त विख्यात गायिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांनी

Mehli Mistry Exit : टाटा समूहात मोठा भूंकप! नोएल टाटांनी करून दाखवलं; रतन टाटांच्या 'या' जवळच्या व्यक्तीची ट्रस्टमधून हकालपट्टी

मुंबई : उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांच्या निधनानंतर टाटा समूहाच्या महत्त्वाच्या धर्मादाय संस्थांमध्ये (Charitable Trusts)

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता