Mumbai News : मुंबईचं रुपडं पालटणार! एमएमआरडीएने आखला मास्टर प्लॅन

  100

मुंबई : स्मार्ट सिटी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहरात सातत्याने नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यात येतात. अशातच आता मुंबई महानगर प्रदेशाला विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यामुळे मुंबई सारख्या महागड्या शहरात कामासाठी आलेल्या लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. (Mumbai News)



एमएमआरडीएने गृहनिर्माण क्षेत्र विकसित करण्याची योजना आखली आहे. यामध्ये सिंगापूरप्रमाणेच मुंबई विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरमध्ये बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील ३० ते ४० टक्के घरे भाड्याने घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या घरांचे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, ही घरे मेट्रो आणि रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या परवडणारी घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.



नागरिकांच्या सुविधेसाठी उभारणार सिंगापूरसारखी घरे


मुंबई हे जगातील सर्वात महागडे शहर आहे. मुंबईतील नागरिक आपल्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम ही घराच्या भाड्यासाठी खर्च करतात. इतर शहरातील लोक फक्त ३० ते ३५ टक्के रक्कम घराच्या भाड्यासाठी वापरली जाते. त्यामुळेच एमएमआरच्या विकासासाठी रेंटल हाउसिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन सिंगापूरसारख्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. (Mumbai News)

Comments
Add Comment

पवईतील गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुंबई : विक्रोळीच्या कन्नमवार नगरमध्ये आमदार सुनील राऊत यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तब्बल २५

लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन, सुवर्ण गजानन महालात शाही थाटात आगमन !

मुंबई: मुंबईत गणेशोत्सवाची सुरुवात होते ती लालबागच्या राजाच्या आगमनाने. यंदाही गणेशोत्सवापूर्वी लालबागच्या

मालाडमध्ये वैष्णवी हाइट्सला आग

मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरातून आगीची बातमी आली आहे. मालाड पूर्व येथे राणी सती मार्गावर असलेल्या वैष्णवी

एअरटेल कंपनीचे मोबाईल नेटवर्क कोलमडले, ग्राहक त्रस्त

मुंबई : देशभरात एअरटेलचे नेटवर्क पुन्हा एकदा बंद पडले आहे. हजारो ग्राहकांना कॉलिंग आणि इंटरनेट सेवेचा वापर करणे

मुंबईच्या राजाच्या आरतीचा मान यंदा 'कोकण नगर गोविंदा पथकाला

मुंबई: मुंबईचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा आपला ९८ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. गेली अनेक वर्षे सामाजिक

रोहिंग्या बांगलादेशींसाठी मनपा शाळांच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न?

लोढा यांचा रोखठोक सवाल मुंबई : मुंबई महापालिकेच्या शासन निर्णयानुसार महापालिकेच्या शाळा चालवण्यासाठी कोणतीही