BJP News : भाजपाला एका वर्षात मिळाली ४३४०.४७ कोटींची देणगी

नवी दिल्ली : असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)ने सोमवारी राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांवरील अहवाल प्रसिद्ध केला. अहवालानुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षात भाजपाला सर्वाधिक ४३४०.४७ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. काँग्रेस १२२५.१२ कोटी रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. एडीआरने म्हटले आहे की, पक्षांना मिळणाऱ्या देणग्यांचा मोठा भाग निवडणूक रोख्यांमधून आला.


भाजपाने त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या ५०.९६% म्हणजेच २२११.६९ कोटी रुपये खर्च केले तर काँग्रेसने त्यांच्या उत्पन्नाच्या ८३.६९% म्हणजेच १०२५.२५ कोटी रुपये खर्च केले. 'आप'ला २२.६८ कोटी रुपये देणग्या मिळाल्या, तर पक्षाने त्याहून अधिक म्हणजे ३४.०९ कोटी रुपये खर्च केले. सर्व पक्षांना मिळालेल्या देणग्यांपैकी ७४.५७% देणग्या एकट्या भाजपाला मिळाल्या आहेत. उर्वरित ५ पक्षांना २५.४३% देणग्या मिळाल्या आहेत. निवडणूक रोख्यांमधून भाजपाला सर्वाधिक १६८५.६३ कोटी रुपये मिळाले, तर काँग्रेसला ८२८.३६ कोटी रुपये, 'आप'ला १०.१५ कोटी रुपये मिळाले.



तिन्ही पक्षांना निवडणूक रोख्यांद्वारे २५२४.१३६१ कोटी रुपये मिळाले, जे त्यांच्या एकूण देणग्यांच्या ४३.३६% आहे. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी मे महिन्यात हे दान असंवैधानिक घोषित केले होते. एडीआरला मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे की २०२३-२४ मध्ये अनेक पक्षांनी ४५०७.५६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे रोखले. राष्ट्रीय पक्षांनी या निधीपैकी ५५.९९% कोटी रुपये खर्च केले. सीपीआय (एम) ला १६७.६३६ कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च