तुम्ही मातीच्या माठातलेच पाणी पिताय ना?

माठांच्या निर्मितीत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर


वाडा (वार्ताहर): उन्हाळ्याला सुरुवात होताच माठांची मागणी वाढते. काळानुसार कुंभाराने माठाचे स्वरूप बदलण्यास सुरुवात केली आहे. यात परप्रांतीय माठाने भर घातली आहे. काही माठांच्या निर्मितीत चक्क प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होत आहे. असे माठ आरोग्याला घातक मानले जातात. बाहेर राज्यातून आलेल्या माठासाठी लाल माती आणि पीओपीचा वापर होत आहे. या माठावर आकर्षक रंगाची कलाकृती करण्यात आली आहे. हे माठ दिसायला सुंदर असतात. यामुळे ग्राहकही या माठाकडे आकर्षित होत आहेत.


माती अथवा परंपरागत काळा माठ आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. सध्या पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यासाठी साधे महाराष्ट्रीय माठ नागरिकांना ऑड वाटत आहेत. डिझाईन आणि नळाची तोटी असलेले माठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. हे माठ झिरपत नाही. अशा माठांच्या निर्मितीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो. पीओपी च्या माठाचा शरीरावर दुष्परिणाम होतो. या माठातील पाणी झिरपत नाही. यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतोय. याशिवाय निसर्गावर ही त्याचा विपरीत परिणाम होतो. जो माठ अधिक पाझरतो त्या माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. पाझरणाऱ्या माठातील पाणी आरोग्याला सुरक्षित व सर्वोत्तम मानले जाते.


आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुने माठ आणि सुरळीचा नागरिकांना विसर पडला आहे. अशा माठाची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे कुंभार समाज बांधवांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. भाजलेला मातीचा माठ ओळखताना तो वाजविल्यानंतर त्यातून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. अशा माठाला भाजलेला माठ असे समजता येते. या माठातून पाणी गाळून शुद्ध होते. पीओपी चा नवीन पद्धतीच्या माठाला बाजारात सर्वाधिक मागणी वाढत आहे. यामुळे परंपरागत माठ निर्मिती व खरेदीचा कल ही कमी झाला आहे. यातून कुंभाराचा पारंपारिक रोजगार बुडत आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये