तुम्ही मातीच्या माठातलेच पाणी पिताय ना?

  103

माठांच्या निर्मितीत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर


वाडा (वार्ताहर): उन्हाळ्याला सुरुवात होताच माठांची मागणी वाढते. काळानुसार कुंभाराने माठाचे स्वरूप बदलण्यास सुरुवात केली आहे. यात परप्रांतीय माठाने भर घातली आहे. काही माठांच्या निर्मितीत चक्क प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होत आहे. असे माठ आरोग्याला घातक मानले जातात. बाहेर राज्यातून आलेल्या माठासाठी लाल माती आणि पीओपीचा वापर होत आहे. या माठावर आकर्षक रंगाची कलाकृती करण्यात आली आहे. हे माठ दिसायला सुंदर असतात. यामुळे ग्राहकही या माठाकडे आकर्षित होत आहेत.


माती अथवा परंपरागत काळा माठ आरोग्यासाठी उत्तम मानला जातो. सध्या पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यासाठी साधे महाराष्ट्रीय माठ नागरिकांना ऑड वाटत आहेत. डिझाईन आणि नळाची तोटी असलेले माठ खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. हे माठ झिरपत नाही. अशा माठांच्या निर्मितीसाठी प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा वापर होतो. पीओपी च्या माठाचा शरीरावर दुष्परिणाम होतो. या माठातील पाणी झिरपत नाही. यामुळे आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतोय. याशिवाय निसर्गावर ही त्याचा विपरीत परिणाम होतो. जो माठ अधिक पाझरतो त्या माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते. पाझरणाऱ्या माठातील पाणी आरोग्याला सुरक्षित व सर्वोत्तम मानले जाते.


आधुनिकीकरणाच्या नावाखाली जुने माठ आणि सुरळीचा नागरिकांना विसर पडला आहे. अशा माठाची विक्री कमी झाली आहे. त्यामुळे कुंभार समाज बांधवांचा व्यवसाय अडचणीत आला आहे. भाजलेला मातीचा माठ ओळखताना तो वाजविल्यानंतर त्यातून विशिष्ट प्रकारचा आवाज येतो. अशा माठाला भाजलेला माठ असे समजता येते. या माठातून पाणी गाळून शुद्ध होते. पीओपी चा नवीन पद्धतीच्या माठाला बाजारात सर्वाधिक मागणी वाढत आहे. यामुळे परंपरागत माठ निर्मिती व खरेदीचा कल ही कमी झाला आहे. यातून कुंभाराचा पारंपारिक रोजगार बुडत आहे.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या