MHADA Home : दक्षिण मुंबईतील १३ हजार इमारतींचा पुनर्विकास करण्यास म्हाडा सज्ज

मुंबई  : मुंबईमध्ये आठ ते दहा दशके जुन्या असलेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या समूह पुनर्विकास याकडे म्हाडाने आता विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. या इमारतींच्या अरुंद जागेमुळे एकाच पुनर्विकासात अनेक तांत्रिक अडथळे येत असल्याने तेथे राहणाऱ्या भाडेकरू व मालकांना पुरेशा सुविधा मिळू शकत नाहीत. त्यामुळे म्हाडा आता क्लस्टर पुनर्विकासाला चालना देण्यासाठी पावले उचलत आहे आणि अधिकाधिक इमारत मालक आणि भाडेकरूंना विकास नियंत्रण नियम ३३(९) अंतर्गत पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील सुमारे १३,००० मोडकळीस आलेल्या उपकर इमारती म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना विभागाअंतर्गत येतात. याअंतर्गत म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी दादर परिसरातील १२ अधिग्रहित आणि पुनर्बांधणी केलेल्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पाला भेट दिली. यावेळी भाडेकरूंशी बोलून त्यांना समूह पुनर्विकासासाठी पुढे येण्याचे आवाहन केले.



समूह पुनर्विकास योजनेत बैठ्या चाळींचाही समावेश करण्यात आला आहे. जयस्वाल यांनी प्रभादेवीतील शंकर घाणेकर मार्गावरील बैठी चाळ आणि जनार्दन अपार्टमेंट या खासगी मालमत्तांचा समावेश विकास नियंत्रण नियम ३३ (९) अन्वये समूह पुनर्विकास योजनेत करावा, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. जयस्वाल यांनी मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या 'ग' उत्तर विभागातील जसोदा सहकारी गृहनिर्माण संस्था, स्वामी समर्थ आणि म्हाडा कायदा कलम ९१ (ए) अंतर्गत अधिग्रहित केलेल्या आरके इमारतीची पाहणी केली. आणि रखडलेली पुनर्विकासाची कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता