तुम्ही 'FASTag' वापरता का? तर ही बातमी तुमच्यासाठी

मुंबई : १७ फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून फास्टॅग(FASTag) साठी नवीन नियम लागू होत आहेत. याबाबत नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने नवीन फास्टॅग बॅलन्स व्हॅलिडेशन नियम जाहीर केले आहेत, जे १७ फेब्रुवारी २०२५ पासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसारफास्टॅग व्हाइटलिस्टेड (सक्रिय), ब्लॅकलिस्टेड (निष्क्रिय) असेल.


अशात जर फास्टॅगमध्ये अपुरा बॅलन्स, KYC झाली नसेल किंवा वाहन नोंदणी तपशीलांमध्ये तफावत आढळली तर तो ब्लॅकलिस्टेड केला जाईल. नवीन नियमांनुसार, जर तुमचे वाहन टोल बूथवर पोहोचण्यापूर्वी फास्टॅग ६० मिनिटांपेक्षा जास्त काळ ब्लॅकलिस्ट केला गेला असेल तर तो शेवटच्या क्षणी रिचार्ज करता येणार नाही. पण, टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केल्यानंतर१० मिनिटांच्या आत टॅग रिचार्ज केल्यास युजरला टोल शुल्क भरता येणार आहे. अशा परिस्थितीत दंड टाळता येणार आहे.


एनपीसीआयच्या २८ जानेवारी रोजीच्या परिपत्रकानुसार, टोल प्लाझावर टॅग स्कॅन झाल्यानंतरच्या विशिष्ट वेळेत आता फास्टॅग व्यवहार वैध केले जातील. यासाठी दोन अटी लागू करण्यात आल्या आहेत. यामध्ये टॅग स्कॅन करण्यापूर्वी ६० मिनिटे आणि टॅग स्कॅन केल्यानंतर १० मिनिटे अशा दोन अटींचा समावेश आहे. जर टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी एका तासापेक्षा जास्त काळ फास्टॅग ब्लॅकलिस्टेड, हॉटलिस्टेड किंवा त्यामध्ये कमी बॅलन्स असेल, तर शुल्क नाकारले जाईल आणि जर टॅग स्कॅन केल्यानंतरही १० मिनिटांपर्यंत निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्टेड राहिला तरीदेखील शुल्क नाकारले जाईल. अशा परिस्थितीत सिस्टम एरर कोड १७६ दाखवले आणि युजरकडून दंड म्हणून टोल शुल्काच्या दुप्पट रक्कम आकारली जाईल.


फास्टॅग युजर्सनी दंड टाळण्यासाठी लांबच्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी प्रवाशांना फास्टॅग खात्यात पुरेसा बॅलन्स शिल्लक ठेवावा लागणार आहे.ब्लॅकलिस्टिंग टाळण्यासाठी प्रवाशांना केवायसी तपशील नियमितपणे अपडेट करावी लागणार आहे.टोल प्लाझावर पोहोचण्यापूर्वी प्रवाशांना फास्टॅगमध्ये किती बॅलेन्स आहे, तो सक्रिय आहे की नाही हे तपासावे लागणार आहे.या सर्व गोष्टींची काळजी घेतल्यास युजर्सना अनावश्यक दंड टाळता येणार आहे.

Comments
Add Comment

भारतीय नौदलाने पाणबुडीतून केली ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी

नवी दिल्ली : भारतीय नौदलाने अरिघात या अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीतून ३५०० किमी मारक क्षमतेच्या K-4 बॅलेस्टिक

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आपच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली : धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम आदमी पार्टीच्या तीन वरिष्ठ नेत्यांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा

देशातील कोणकोणत्या रेल्वेच्या तिकिटांच्या दरांत शुक्रवार २६ डिसेंबरपासून वाढ होणार ?

नवी दिल्ली : भारतीय रेल्वे प्रशासनाने शुक्रवार २६ डिसेंबरपासून देशातील निवडक रेल्वे सेवांच्या दरात वाढ केली

अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान

गणेश उइकेसह पाच नक्षलवादी ठार, सुरक्षा पथकांचे मोठे यश

कंधमाल : सुरक्षा पथकांनी ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात माओवादी नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली. फक्त दोन

नाताळनिमित्त मोदींनी चर्चमध्ये जाऊन केली प्रार्थना

नवी दिल्ली : नाताळचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील कॅथेड्रल चर्चला भेट दिली. मोदींनी