Pen Temprature : पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली, नागरिकांना जाणवू लागल्या उन्हाच्या झळा

पेण : रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे. तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान अचानक १ अंश सेल्सिअसने वाढले असून रात्री मात्र थंडी जाणवत आहेत. दिवसा उन्ह व रात्री गुलाबी थंडीमुळे शरीरावर विचित्र परिणाम होऊन आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील काही दिवसांत हवेच्या वरच्या स्थरात असलेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती आणि उत्तरेत थंडीच्या लाटांसह थंड हवेचे झोत येण्याची शक्यता नसल्यामुळे रायगड जिल्ह्यासह देशभरात फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरीत दिवसांमध्ये उन्हाच्या झळांची तीव्रता वाढणार आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोमवारपासून हवेच्या वरच्या स्थरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेत असलेले थंड वारे जिल्ह्यापर्यंत येणार नाहीत. शिवाय पुढील आठवडाभरात थंड हवेचे झोत अथवा थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्तरेतून थंड हवा येण्याची शक्यता मावळली आहे.


पेण तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागात तापमान वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात भर म्हणून अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील काळात तापमानात आणखी एक अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. थंड हवेचे झोत म्हणजेच थंड वारे येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या तापमानात वाढ होऊन तापमान स्थिर झाले आहे.


त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. या महिन्याच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊन पेणकरांना होळी सणापूर्वी पासूनच उन्हाळ्याची चाहूल लागेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

पिवळ्या आणि काळ्या मनुका, आरोग्याला कोणत्या जास्त फायद्याच्या ?

मुंबई : मनुका आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. लोक अनेकदा सकाळी रात्री भिजवलेले मनुका खातात, ज्यामुळे

माझ्या विजयात प्रतिका रावलचाही समान हक्क! स्मृती मानधनाच्या एका वाक्याने चाहते खूश

नवी मुंबई: महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीसाठी रविवार, २३ ऑक्टोबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड

एकाच कुटुंबातील पाचजणांनी केला सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न, एकाचा मृत्यू! पनवेलमधील धक्कादायक घटना

पनवेल: पनवेलमध्ये एका कुटुंबाने सामुहिक आत्महत्या करत स्वत:ला संपण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आता दहा पदरी! 'एमएसआरडीसी' लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाचे आठऐवजी दहा पदरीकरण

छट पूजेसाठी मुंबई महापालिका यंत्रणा सज्ज; मंत्री लोढा यांच्यासह भाजप नेते घेणार तयारीचा आढावा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगर परिसरात मोठ्या संख्येने उत्तर भारतीय लोक राहतात. त्यामुळे येत्या २७ आणि २८ ऑक्टोबरला

वरळी कोळीवाड्याची किनारपट्टी होणार चकाचक, दिवसाला किती खर्च होतो माहीत आहे का?

मुंबई (खास प्रतिनिधी) : वरळी कोळीवाडा समुद्र किनाऱ्याची स्वच्छता राखण्याकरता यापूर्वी नियुक्त करण्यात आलेल्या