Pen Temprature : पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली, नागरिकांना जाणवू लागल्या उन्हाच्या झळा

पेण : रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे. तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान अचानक १ अंश सेल्सिअसने वाढले असून रात्री मात्र थंडी जाणवत आहेत. दिवसा उन्ह व रात्री गुलाबी थंडीमुळे शरीरावर विचित्र परिणाम होऊन आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील काही दिवसांत हवेच्या वरच्या स्थरात असलेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती आणि उत्तरेत थंडीच्या लाटांसह थंड हवेचे झोत येण्याची शक्यता नसल्यामुळे रायगड जिल्ह्यासह देशभरात फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरीत दिवसांमध्ये उन्हाच्या झळांची तीव्रता वाढणार आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोमवारपासून हवेच्या वरच्या स्थरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेत असलेले थंड वारे जिल्ह्यापर्यंत येणार नाहीत. शिवाय पुढील आठवडाभरात थंड हवेचे झोत अथवा थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्तरेतून थंड हवा येण्याची शक्यता मावळली आहे.


पेण तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागात तापमान वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात भर म्हणून अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील काळात तापमानात आणखी एक अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. थंड हवेचे झोत म्हणजेच थंड वारे येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या तापमानात वाढ होऊन तापमान स्थिर झाले आहे.


त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. या महिन्याच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊन पेणकरांना होळी सणापूर्वी पासूनच उन्हाळ्याची चाहूल लागेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे