Pen Temprature : पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढली, नागरिकांना जाणवू लागल्या उन्हाच्या झळा

  55

पेण : रायगड जिल्ह्यातील अनेक शहरांसह पेण तालुक्यात उन्हाची तीव्रता अचानक वाढली आहे. तालुक्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. तापमान अचानक १ अंश सेल्सिअसने वाढले असून रात्री मात्र थंडी जाणवत आहेत. दिवसा उन्ह व रात्री गुलाबी थंडीमुळे शरीरावर विचित्र परिणाम होऊन आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुढील काही दिवसांत हवेच्या वरच्या स्थरात असलेली वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती आणि उत्तरेत थंडीच्या लाटांसह थंड हवेचे झोत येण्याची शक्यता नसल्यामुळे रायगड जिल्ह्यासह देशभरात फेब्रुवारी महिन्याच्या उर्वरीत दिवसांमध्ये उन्हाच्या झळांची तीव्रता वाढणार आहे.



हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात सोमवारपासून हवेच्या वरच्या स्थरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे उत्तरेत असलेले थंड वारे जिल्ह्यापर्यंत येणार नाहीत. शिवाय पुढील आठवडाभरात थंड हवेचे झोत अथवा थंडीची लाट येण्याची शक्यता नाही. त्यामुळे उत्तरेतून थंड हवा येण्याची शक्यता मावळली आहे.


पेण तालुक्यात ग्रामीण भागासह शहरी भागात तापमान वाढ झालेली दिसून येत आहे. त्यात भर म्हणून अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वारे राज्याच्या दिशेने येत असल्यामुळे कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. पुढील काळात तापमानात आणखी एक अंश सेल्सिअसने वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत. थंड हवेचे झोत म्हणजेच थंड वारे येण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे पहाटेच्या तापमानात वाढ होऊन तापमान स्थिर झाले आहे.


त्यामुळे कमाल आणि किमान तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. या महिन्याच्या अखेरीपासून उन्हाच्या झळा अधिक तीव्र होऊन पेणकरांना होळी सणापूर्वी पासूनच उन्हाळ्याची चाहूल लागेल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेऊन सावधानता बाळगावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments
Add Comment

एका मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर : पावसाची अपेक्षित दणकेबाज सुरुवात... शेतीची सर्व कामे आटोपलेली... मनात विठुरायाच्या दर्शनाची आस...

मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार !

७ जुलैच्या डब्याची सोय करून ठेवा! मुंबई (प्रतिनिधी) :मुंबईच्या गर्दीतून, पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यास रेल्वेचे तिकीट मिळेना

रात्रभर रांगेत जागूनही झाल्या दोन मिनिटांत गाड्या फुल्ल मुंबई (प्रतिनिधी) : गणेशोत्सवासाठी गावाकडे नाणान्य

प्रवास झाला स्मार्ट ! 'हायवे यात्रा' अ‍ॅप सांगणार कमी टोलचा रस्ता

नवी दिल्ली (प्रतिनिधी): जर तुम्ही अनेकदा राष्ट्रीय महामार्गावर रोड ट्रिप करत असाल तर तुमच्यासाठी एक दिलासादायक

ठाण्यात पहिल्या ‘स्पेस एज्युकेशन लॅब’ची निर्मिती होणार

अंबर इंटरनॅशनल स्कूल, व्योमिका स्पेस अ‍ॅकॅडमी यांच्यात सामंजस्य करार संपन्न ठाणे : ठाण्यातील ‘अंबर इंटरनॅशनल

काळू धरणातील विस्थापितांचे पुनर्वसन खापरी गावात नको

स्थानिक ग्रामस्थांचे मुरबाड तहसीलदारांना निवेदन मुरबाड : ठाणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा