Western Railway : पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांची स्थिती सुधारणार

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छतागृहांच्या देखभालीवर भर दिला जाईल तसेच अधिक पैसे आकारण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेत गेल्यावर्षी सात कंत्राटे रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.



रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला असून, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी व्यापक पावले उचलण्याचे ठरवले आहे. पे अँड युज संकल्पनेंतर्गत चालवली जाणारी स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी अधिक स्वच्छ, सुसज्ज आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार आहे.


स्थानकांवरील अनेक स्वच्छतागृहांत प्रवाशांकडून नियमानुसार शुल्क न घेता अधिक पैसे वसूल केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर कारवाई करीत पश्चिम रेल्वे प्रशासनाने २०२४ मध्ये ७० स्थानकांवरील तपासणीदरम्यान सात कंत्राटे रद्द केली. तसेच जादा शुल्क आकारणाऱ्या कंत्राटदारांकडून तब्बल २१.५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर नियमभंग करणाऱ्या कंत्राटदारांकडून ११.५६ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

Comments
Add Comment

भावनिक आवाहनाला न फसता महाराष्ट्राच्या विकासाला मतदारांची पसंती - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

मुंबई : वर्षानुवर्षे भाजपा कार्यकर्त्याने यशाच्या दिशेने पार्टीला नेण्याचे स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न साकार

BMC Election 2026 : भाजपची ऐतिहासिक मुसंडी तर ठाकरे, काँग्रेसचं काय? २९ महापालिकांच्या रणसंग्रामाचे 'A to Z' अपडेट्स!

मुंबई : भाजपचे निर्विवाद वर्चस्व राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) दणदणीत

 कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मलबार हिलचा गड राखला, भाजपाचे पाचही उमेदवार विजयी - मलबार हिल मध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबईतला आपला मलबार हिलचा गड राखला आहे. त्यांच्या

BMC Election 2026 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीची २९ पैकी १४ महापालिकेत घसरगुंडी! पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही भोपळा फुटला नाही

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा निकाल आज समोर येत असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील

मुंबईत महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून केले अभिनंदन

राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये महायुतीच अव्वल मुंबई : अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई

Raj Thackeray : भावाशी युती करूनही राज ठाकरेंच्या खात्यात २२ शून्य, मुंबईत 'मनसे'ला जबरदस्त धक्का; ठाकरे ब्रँड फेल!

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेसाठी २० वर्षांचा वनवास संपवून एकत्र आलेल्या 'ठाकरे बंधूं'साठी आजचा निकाल