Western Railway : पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांची स्थिती सुधारणार

  46

मुंबई : पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत असल्याने त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्याने लक्ष दिले जाईल, असे पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केले. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी स्वच्छतागृहांच्या देखभालीवर भर दिला जाईल तसेच अधिक पैसे आकारण्याबाबतच्या तक्रारींची दखल घेत गेल्यावर्षी सात कंत्राटे रद्द करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.



रेल्वे प्रशासनाने स्थानकांवरील स्वच्छतागृहांच्या व्यवस्थापनाचा आढावा घेतला असून, त्यांची स्थिती सुधारण्यासाठी व्यापक पावले उचलण्याचे ठरवले आहे. पे अँड युज संकल्पनेंतर्गत चालवली जाणारी स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी अधिक स्वच्छ, सुसज्ज आणि सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार आहे.


स्थानकांवरील अनेक स्वच्छतागृहांत प्रवाशांकडून नियमानुसार शुल्क न घेता अधिक पैसे वसूल केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यावर कारवाई करीत पश्चिम रेल्वे प्रशासनाने २०२४ मध्ये ७० स्थानकांवरील तपासणीदरम्यान सात कंत्राटे रद्द केली. तसेच जादा शुल्क आकारणाऱ्या कंत्राटदारांकडून तब्बल २१.५६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, तर नियमभंग करणाऱ्या कंत्राटदारांकडून ११.५६ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली.

Comments
Add Comment

सौर पंप शक्य नसल्यास पारंपरिक कृषी पंप देणार

भौगोलिक परिस्थितीनुसार निर्णय घेणार मुंबई : राज्य शासनाने सौर ऊर्जेवर आधारित कृषी पंप देण्यावर भर दिला आहे.

वाहतूकदारांच्या संपात ७० हजार वाहने सहभागी

नागरिकांसह आयात-निर्यातदारांना संपाचा मोठा फटका मुंबई : ई-चलन व वाहतूकदारावर लाभलेल्या इतर अनेक अन्यायकारक

मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करण्याचे निर्देश

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कबुतरखान्यांमुळे श्वसन तसेच फुफ्फुसांचे आजार वाढले असून यात काही रहिवाशांचा

Nitesh Rane : “पिक्चर अभी बाकी हैं”, ‘तुम्हाला सांगून ठेवलेली उत्तर रेकॉर्ड करुन’ नंतर एकत्र…मंत्री नितेश राणेंचा हल्लाबोल

मुंबई : दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई

आरोग्यास अपायकारक तरीही मुंबई महापालिकेच्या हद्दीत ५१ कबुतरखाने पुन्हा सुरू

मनपाने मुंबईतील कबूतरखान्यांबाबत विशेष अभियान राबवावे – मंत्री उदय सामंत मुंबई : सध्या मुंबई महापालिकेच्या

शक्तीपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी : मंत्री नितेश राणे

मुंबई : शक्तीपीठ महामार्ग हा लोकांच्या विकासासाठी आहे. या प्रकल्पासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी मी पालकमंत्री