Bank Issue : बँक आर्थिक अडचणीत सापडली तर ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ?

नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन किंवा पालन न करणे तसेच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कठोर पाऊले उचलत असते. नुकतेच नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) काही निर्बंध (RBI Action) लादले. यामध्ये या बँकेतील खअते धारकांना पैसे ठेवणे आणि काढण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेबाहेर खात्यातील पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, आरबीआयने याआधी प्राईव्हेटसह अनेक सहकारी बँकेवर अशा प्रकारची कारवाई केली आहे. मात्र बँक आर्थिक अडचणीत सापडल्यास ग्राहकांच्या पैशांचे काय होते, पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी खातेधारकांनी काय करावे (Bank Issue), हे जाणून घ्या.




  • कोणतीही बँक डबघाईला आली किंवा आरबीआयने तिचा परवाना रद्द केला, तर ग्राहकांना त्यांच्या खात्यातील जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळू शकतात.

  • ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण (DICGC) असते. त्यामुळे ग्राहकाचे खाते, एफडी आणि बचत खाते मिळून

  • एकूण ५ लाखांपर्यंतच रक्कम परत मिळते. तसेच जर एका बँकेत वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे ठेवले असतील, तरीही जास्तीत जास्त ५ लाख मिळू शकतात.


पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?



  • पूर्ण रक्कम एका बँकेत ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवा.

  • पब्लिक सेक्टर बँका (PSU) आणि मोठ्या खाजगी बँकांमध्ये पैसे जमा करा.

  • को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठी रक्कम ठेवण्यापासून टाळा.

  • एकाच बँकेत ५ लाखांहून अधिक ठेवी ठेवू नका, कारण विमा संरक्षणाची मर्यादा ५ लाखांपर्यंतच आहे.

  • जर तुमच्याकडे ८ लाख रुपये असतील आणि ते दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवले असतील (प्रत्येकी ४ लाख), आणि जर दोन्ही बँका दिवाळखोरीत गेल्या, तरीही तुम्हाला पूर्ण ८ लाख रुपये परत मिळू शकतात.


कोणत्या बँकेत पैसे ठेवणे सुरक्षित?



  • राष्ट्रीयीकृत (PSU) बँकांमध्ये ठेवी ठेवा – जसे की SBI, Bank of Baroda, PNB इत्यादी.

  • मोठ्या खाजगी बँकांमध्ये ठेवा – HDFC, ICICI, Kotak Mahindra इत्यादी.

  • को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवण्यापासून टाळा. (Bank Issue)

Comments
Add Comment

पर्यटन क्षेत्रात जगभरात ९ कोटी नवीन नोकऱ्यांची निर्मिती ?

दिल्ली(वृत्तसंस्था): पुढील १० वर्षांत आंतरराष्ट्रीय प्रवास आणि पर्यटन क्षेत्र ९ कोटी नवीन नोकऱ्या निर्माण

नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा

नाशिक(प्रतिनिधी): आठवड्यातून तीनच दिवस मर्यादित असलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा पूर्ववत करण्यात आली असून आता

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

लाडक्या बहिणींची 'ई केवायसी'तील तांत्रिक अडचण लवकर दूर करणार, मंत्री आदिती तटकरेंचे आश्वासन

मुंबई(प्रतिनिधी): मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना आता 'ई-केवायसी' बंधनकारक केली आहे.

ठाकरे बंधूंची मात्रोश्रीवर भेट, राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांच्या शक्यता

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या जवळीकीच्या बातम्या चर्चेत आल्या आहेत. शिवसेना

नेपाळमध्ये मुसळधार पाऊस; भूस्खलनात १८ जणांचा मृत्यू

काठमांडू(वृत्तसंस्था): नेपाळमधील कोशी प्रांतात शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या