Bank Issue : बँक आर्थिक अडचणीत सापडली तर ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ?

नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन किंवा पालन न करणे तसेच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कठोर पाऊले उचलत असते. नुकतेच नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) काही निर्बंध (RBI Action) लादले. यामध्ये या बँकेतील खअते धारकांना पैसे ठेवणे आणि काढण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेबाहेर खात्यातील पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, आरबीआयने याआधी प्राईव्हेटसह अनेक सहकारी बँकेवर अशा प्रकारची कारवाई केली आहे. मात्र बँक आर्थिक अडचणीत सापडल्यास ग्राहकांच्या पैशांचे काय होते, पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी खातेधारकांनी काय करावे (Bank Issue), हे जाणून घ्या.




  • कोणतीही बँक डबघाईला आली किंवा आरबीआयने तिचा परवाना रद्द केला, तर ग्राहकांना त्यांच्या खात्यातील जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळू शकतात.

  • ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण (DICGC) असते. त्यामुळे ग्राहकाचे खाते, एफडी आणि बचत खाते मिळून

  • एकूण ५ लाखांपर्यंतच रक्कम परत मिळते. तसेच जर एका बँकेत वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे ठेवले असतील, तरीही जास्तीत जास्त ५ लाख मिळू शकतात.


पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?



  • पूर्ण रक्कम एका बँकेत ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवा.

  • पब्लिक सेक्टर बँका (PSU) आणि मोठ्या खाजगी बँकांमध्ये पैसे जमा करा.

  • को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठी रक्कम ठेवण्यापासून टाळा.

  • एकाच बँकेत ५ लाखांहून अधिक ठेवी ठेवू नका, कारण विमा संरक्षणाची मर्यादा ५ लाखांपर्यंतच आहे.

  • जर तुमच्याकडे ८ लाख रुपये असतील आणि ते दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवले असतील (प्रत्येकी ४ लाख), आणि जर दोन्ही बँका दिवाळखोरीत गेल्या, तरीही तुम्हाला पूर्ण ८ लाख रुपये परत मिळू शकतात.


कोणत्या बँकेत पैसे ठेवणे सुरक्षित?



  • राष्ट्रीयीकृत (PSU) बँकांमध्ये ठेवी ठेवा – जसे की SBI, Bank of Baroda, PNB इत्यादी.

  • मोठ्या खाजगी बँकांमध्ये ठेवा – HDFC, ICICI, Kotak Mahindra इत्यादी.

  • को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवण्यापासून टाळा. (Bank Issue)

Comments
Add Comment

मुंबईत उद्धव समर्थक आणि भाजपचे एकमेकांविरोधात बॅनरयुद्ध

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएचा विजय झाला. यानंतर भाजपचे मिशन मुंबई लगेच सुरू झाले आहे. बिहारमध्ये

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

तृप्ती देसाईंचे इंदुरीकर महाराजांना ओपन चॅलेंज

अहिल्यानगर : लग्नासाठी कर्ज काढून मोठा खर्च करणे टाळा, असे आवाहन इंदुरीकर महाराजांनी किर्तनातून नागरिकांना केले

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

Disney vs Youtube Update: युट्यूब टीव्ही दर्शकांसाठी मोठी बातमी: डिस्ने युट्यूब वादाला ब्रेक

करार अखेर संपन्न यूट्यूब टीव्हीमध्ये डिस्ने कंटेट पुन्हा पूर्ववत होणार प्रतिनिधी: आंतरराष्ट्रीय