Bank Issue : बँक आर्थिक अडचणीत सापडली तर ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ?

नवी दिल्ली : नियमांचे उल्लंघन किंवा पालन न करणे तसेच आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बँकांबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) कठोर पाऊले उचलत असते. नुकतेच नियमांचे पालन न केल्यामुळे आरबीआयने मुंबईतील न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर (New India Co-operative Bank) काही निर्बंध (RBI Action) लादले. यामध्ये या बँकेतील खअते धारकांना पैसे ठेवणे आणि काढण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे ग्राहकांनी बँकेबाहेर खात्यातील पैसे काढण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान, आरबीआयने याआधी प्राईव्हेटसह अनेक सहकारी बँकेवर अशा प्रकारची कारवाई केली आहे. मात्र बँक आर्थिक अडचणीत सापडल्यास ग्राहकांच्या पैशांचे काय होते, पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी खातेधारकांनी काय करावे (Bank Issue), हे जाणून घ्या.




  • कोणतीही बँक डबघाईला आली किंवा आरबीआयने तिचा परवाना रद्द केला, तर ग्राहकांना त्यांच्या खात्यातील जास्तीत जास्त ५ लाख रुपये मिळू शकतात.

  • ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षण (DICGC) असते. त्यामुळे ग्राहकाचे खाते, एफडी आणि बचत खाते मिळून

  • एकूण ५ लाखांपर्यंतच रक्कम परत मिळते. तसेच जर एका बँकेत वेगवेगळ्या शाखांमध्ये पैसे ठेवले असतील, तरीही जास्तीत जास्त ५ लाख मिळू शकतात.


पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी काय करावे?



  • पूर्ण रक्कम एका बँकेत ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवा.

  • पब्लिक सेक्टर बँका (PSU) आणि मोठ्या खाजगी बँकांमध्ये पैसे जमा करा.

  • को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठी रक्कम ठेवण्यापासून टाळा.

  • एकाच बँकेत ५ लाखांहून अधिक ठेवी ठेवू नका, कारण विमा संरक्षणाची मर्यादा ५ लाखांपर्यंतच आहे.

  • जर तुमच्याकडे ८ लाख रुपये असतील आणि ते दोन वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवले असतील (प्रत्येकी ४ लाख), आणि जर दोन्ही बँका दिवाळखोरीत गेल्या, तरीही तुम्हाला पूर्ण ८ लाख रुपये परत मिळू शकतात.


कोणत्या बँकेत पैसे ठेवणे सुरक्षित?



  • राष्ट्रीयीकृत (PSU) बँकांमध्ये ठेवी ठेवा – जसे की SBI, Bank of Baroda, PNB इत्यादी.

  • मोठ्या खाजगी बँकांमध्ये ठेवा – HDFC, ICICI, Kotak Mahindra इत्यादी.

  • को-ऑपरेटिव्ह बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम ठेवण्यापासून टाळा. (Bank Issue)

Comments
Add Comment

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा'च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले विद्यार्थ्यांना 'हे' कानमंत्र

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या

मुलतानी बेकरीच्या मालकाने उचलेले टोकाचे पाऊल; सोलापुरात खळबळ

सोलापूर: सोलापुरात एकेकाळी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या मुलतानी बेकरीचे मालक सुनील मोतीलाल सदारंगानी यांनी

Mumbai Pune Expressway: तिसऱ्या दिवशीही पुणे-मुंबई एक्स्प्रेस वे जैसे थे..; प्रवाशी हतबल

मुंबई: आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी पहाटेपासूनच मुंबई- पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडी झाल्याने

HSRP Number Plate: वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी; HSRP नंबर प्लेट बसवली नाही तर...

वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. तुम्ही जर अजूनही तुमच्या गाडीला नवीन नंबरप्लेट बसवून घेतली नसेल तर तुमचे

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७

पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिका लागली कामाला

दोन महिन्यांत २ हजार कोटींचे आहे लक्ष्य मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाने आर्थिक वर्ष