अटल सेतू शनिवारी रात्री ११ पासून रविवारी दुपारी १ पर्यंत बंद राहणार

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे (एमएमआरडीए) रविवार १६ फेब्रुवारी २०२५ रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन सुलभतेने व्हावे आणि गर्दीचे व्यवस्थापन करणे सोपे व्हावे यासाठी वाहतूक पोलिसांनी अटल सेतूवर (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) वाहतूक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मॅरेथॉन मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले या भागात पहाटे चार वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत आहे. यामुळे वाहतूक पोलिसांनी अटल सेतू शनिवार १५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजल्यापासून रविवार १६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात अटल सेतूवर दोन्ही दिशांची वाहतूक बंद राहणार आहे.



सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग आणि अतिरिक्त पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग, नवी मुंबई, विठ्ठल कुबडे यांनी मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) अंतर्गत वाहतूक निर्बंध लागू करणारा आदेश काढला आहे. निर्बंधांनुसार, मॅरेथॉनसाठी आवश्यक असलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना अटल सेतूवर प्रवेशबंदी असेल. प्रामुख्याने मुंबई, पुणे, उरण आणि जेएनपीटी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उरणहून येणारे गव्हाण फाटा, उरण फाटा आणि वाशी मार्गे प्रवास करू शकतील. पुणे-मुंबई वाहतुकीसाठी यशवंतराव चव्हाण एक्सप्रेसवे बेलापूर आणि वाशी मार्गे उपलब्ध असेल. कोकण आणि पनवेलहून येणारी वाहने देखील उरण फाटा आणि वाशी मार्गे प्रवास करू शकतील, असे वाहतूक विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.



पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने, रुग्णवाहिका आणि इतर आपत्कालीन सेवा तसेच मॅरेथॉनमध्ये थेट सहभागी असलेल्या वाहनांना अटल सेतूवरील निर्बंधांतून सवलत देण्यात आली आहे. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे आणि गैरसोय टाळावी; असेही आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
Comments
Add Comment

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

मुंबईतील महापालिका प्रकल्प कामांना मिळणार गती, पुढील महिन्यात ताब्यात येणार १५०० प्रकल्पबाधितांसाठीच्या सदनिका

मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : प्रकल्पबाधित नागरिकांच्या पुनर्वसनासाठी मुंबईतील महापालिकेच्या प्रत्येक प्रशासकीय

मनरेगा मजुरांची होळी होणार आनंदात साजरी

केंद्राकडून १,१३८ कोटींची थकीत मजुरी मंजूर केंद्र सरकारकडून तब्बल ११३८ कोटी रुपयांची थकीत मजुरी राज्याला

'मुलांनी आणि तरुणांनी मराठी भाषा विसरू नये'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : इतर भाषांच्या प्रभावाखाली मराठी भाषा हळूहळू नाहीशी होईल, अशी भीती व्यक्त केली जाते. पण,

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन