महाकुंभमेळ्यात ५० कोटींपेक्षा अधिक भाविकांचे स्नान

लखनौ : उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी १५०० कोटी रुपये खर्च झाले असून त्या बदल्यात ३ लाख कोटी रुपयांचा फायदा होत आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे.



सध्या सरकारी आकडेवारीनुसार, महाकुंभमध्ये पवित्र स्नान करणा-या भाविकांची संख्या ५० कोटींपेक्षा जास्त झाली आहे. आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमात इतक्या मोठ्या संख्येने लोक सहभागी झाल्याचे पुरावे मिळालेले नाहीत, असे म्हटले जात आहे.



दरम्यान, महाकुंभमेळा संपण्यास अजून बराच वेळ आहे. महाकुंभमेळ्यातील शेवटचे अमृत स्नान देखील बाकी आहे, जे महाशिवरात्रीला होणार आहे. त्यामुळे येथे येणा-या भाविकांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ब्राझीलच्या रिओ कार्निव्हल किंवा जर्मनीच्या ऑक्टोबर फेस्टमध्ये जमणारी मोठी गर्दी देखील प्रयागराजमधील आयोजित महाकुंभमेळ्याच्या तुलनेत काहीच नाही. शुक्रवारी प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यात आणखी एक नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे. महाकुंभदरम्यान ३०० स्वच्छता कर्मचा-यांनी गंगा आणि संगम नदीवरील राम घाट, गंगेश्वर घाट आणि भारद्वाज घाट या तीन घाटांची अर्धा तास सतत स्वच्छता करून एक नवा विक्रम केला आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स टीमचे ज्युरी सदस्य प्रवीण पटेल यांच्या देखरेखीखाली हा नवा विक्रम करण्यात आला आहे. महाकुंभमेळ्यात घडलेला हा अनोखा विक्रम याआधी जगात कोणीही केलेला नाही.
Comments
Add Comment

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व

भारत सर्वाधिक लठ्ठ मुलांचा देश : युनिसेफ

खाद्यपदार्थांच्या लेबलमुळे ओळखता येणार पदार्थ नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहा वर्षांत भारत हा जगातील सर्वाधिक

आजारी असल्याने बॉसकडे रजा मागितली आणि १० मिनिटांतच झाला मृत्यू, नेमकं घडलं तरी काय...

नवी दिल्ली: एका कर्मचाऱ्याने त्याच्या बॉसला पाठवलेला मेसेज आणि त्यानंतर १० मिनिटांतच त्याचा झालेला मृत्यू या