Nitesh Rane : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजना लाभार्थी निवडीचा लकी ड्रॉ

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांची निवड


मुंबई  : प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत विविध लाभांचे वाटप करण्यासाठी आज लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झालेल्या लकी ड्रॉमध्ये या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. मित्तल टॉवर येथील मत्स्य व्यवसाय आयुक्तालयामध्ये या लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोहित आणि रोहित या दोन लहामुलांच्या हस्तेही काही लाभार्थ्यांच्या चिठ्ठ्यांची निवड करण्यात आली. यावेळी मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मत्स्यउद्योग महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक अनिता मेश्राम यांच्यासह विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या लकी ड्रॉमध्ये प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेतील १७ विविध योजनांच्या एकूण २३४ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. एकूण ८९ कोटी ११ लाख रुपयांचा लाभ या लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.



गोड्या पाण्यातील मत्स्य बीज पालन या महिलागटासाठी एकूण ६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. २५ लाख रुपये प्रती लाभार्थी या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ या योजनेतून दिला जाणार आहे. मत्स्य तलाव जैविक प्रकल्प या ५० लक्ष रुपयांच्या प्रकल्पाचा लाभ अनुसुचित जमातीच्या ६ लाभार्थ्यांना आणि ३२ महिला लाभार्थ्यींची निवड करण्यात आली. या योजनेमध्ये प्रत्येकी २५ लक्ष या प्रमाणे एकूण दीड कोटी रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. मध्यम मत्स्य जैविक प्रकल्पासाठी २७ लाभार्थी निवड करण्यात आली.


प्रत्येकी २५ लक्ष रुपये याप्रमाणे एकूण ६ कोटी ७५ लक्ष रुपयांचा लाभ दिला जाणार आहे. जलाशयामध्ये पिंजरा पद्धतीने मत्स्य पालनासाठी २२ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. या योजनेत प्रत्येकी ५४ लक्ष या प्रमाणे एकूण ११ कोटी ८८ लक्ष रुपयांचा लाभ दिला जातो. १० टन क्षमतेचे शितगृह आणि बर्फ कारखाना उभारणे या योजनेसाठी ५ महिला लाभार्थींची निवड करण्यात आली. या योजनेत प्रती लाभार्थी ४० लक्ष या प्रमाणे एकूण २ कोटींचा लाभ दिला जातो.

Comments
Add Comment

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मशीद, सँडहर्स्ट रोड आणि काही थांबे रद्द मुंबई : मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार?

शरद पवार गटाकडून हालचालींना सुरुवात मुंबई : राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल आल्यानंतर, आता सर्वच राजकीय

मुंबईत ४५ हजार शासकीय निवासस्थाने बांधणार

महापालिका निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय मुंबई : राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचे निकाल लागले आहेत.

मतदान अधिक, तरीही एमआयएमपेक्षा मनसेच्या जागा कमी

मुंबई : मुंबई महापालिकेच्या झालेल्या निवडणुकीत एआयएमआयएम पक्षाला मिळालेले यश हा चर्चेचा विषय झाला आहे. या

मुस्लीम मतदारांची मते यापुढेही निर्णायक ठरणार

मुंबई : संपूर्ण राज्यातील महानगरपालिकांमध्ये एआयएमआयएमचे ९५ च्या आसपास नगरसेवक निवडून आले असून त्यात मुंबईतील

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुंबईतील राजाबाई टॉवर, ग्रंथालय इमारत, वस्तुसंग्रहालयाचे संवर्धन मुंबई : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व