Social Media : सोशल मीडियावर टाकलेल्या लग्नाच्या फोटोंमुळे १७ वर्षीय मुलीची नरकातून सुटका

  103

राजस्थानमधील तस्करीचा भयंकर प्रकार उघड


मैनपुरी : एका साध्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे १७ वर्षीय मुलीच्या आठ महिन्यांच्या दुर्दैवी नरकाच्या प्रवासाचा शेवट झाला. राजस्थानमधील एका पुरुषाच्या ऑनलाइन लग्नाच्या फोटोंमुळे तिच्या तस्करीचा आणि अत्याचाराचा भयंकर गुंता पोलिसांनी उलगडला.


या घटनेला १८ मे २०२४ पासून सुरुवात झाली. मैनपुरी येथील कोचिंग क्लासला जात असताना, ओळखीच्या एका पुरुषाने या मुलीचे अपहरण केले. तिला वेटिंग कारमध्ये जबरदस्तीने बसवून गुंगीचे औषध देण्यात आले. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुढील आठ महिन्यांत, तिला एक शहर सोडून दुसऱ्या शहरात तस्करी करण्यात आले. या काळात तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला, विक्री केली गेली आणि पुन्हा विकण्यात आले. शेवटी, तिला राजस्थानच्या अजमेरमध्ये पोहोचवण्यात आले. जिथे विष्णू माळी नावाच्या व्यक्तीने तिला ३.५ लाख रुपयांना विकत घेतले. तो तरुण स्वतःसाठी एक "वधू" शोधत होता.



ब-याच प्रयत्नानंतर वधू सापडल्याने विष्णू माळीने लग्नाच्या उत्साहात त्याचे आणि त्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हाच फोटो मैनपुरीपर्यंत पोहोचला आणि काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीची ओळख उघड झाली. स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांच्या मदतीने विष्णू माळीला अटक केली आणि मुलीला सुखरूप परत आणले.


पोलीस तपासात उघड झाले की, नीरज नावाच्या व्यक्तीने तिला पहिल्यांदा अपहरण करून इटावामध्ये नेले. तेथे तिला ड्रग्ज देऊन बलात्कार करण्यात आला आणि आग्र्यातील रवी व बॉबी नावाच्या व्यक्तींना विकण्यात आले. यानंतर, तिला अजमेरमध्ये तस्करी करण्यात आले आणि स्थानिक आशा जैन या महिलेने तिला पुन्हा विकले. अखेर, विष्णू माळीशी तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.


माळीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना योग्य मुलगी मिळण्यात अडचण येत असल्याने त्यांनी "वधू खरेदी" केली.


दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी अनेक महिने आपल्या मुलीचा शोध घेतला आणि हरवलेली मुलगी शोदण्यासाठी पोलिसांकडे वारंवार मदत मागितली.


या प्रकरणावर मैनपुरीचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अनिल कुमार म्हणाले, की, "सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सर्व आरोपींवर बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल."


सध्या मुलगी सुरक्षित आहे, मात्र मानसिक आघातातून सावरण्यासाठी तिच्यावर उपचार सुरू आहेत. असे असले तरी या घटनेने पुन्हा एकदा देशातील मानवी तस्करीच्या भयावह वास्तवाकडे लक्ष वेधले आहे.

Comments
Add Comment

शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही- पंतप्रधानांची ग्वाही, अमेरिकेच्या ५० टक्के टॅरिफवर व्यक्त केला वज्र निर्धार

अहमदाबाद : शेतकरी, लघु उद्योजक आणि पशुपालकांचे हित हेच माझ्यासाठी सर्वोच्च असल्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र

पंतप्रधान मोदींची पदवी सार्वजनिक करण्याचे आदेश दिल्ली हायकोर्टाने केले रद्द

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवीची माहिती सार्वजनिक करण्याचे केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी)

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

जैसलमेरमध्ये खोदकामात आढळले २०१ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या फायटोसॉरचे जीवाश्म

जैसलमेर: राजस्थानमधील एका गावात तलावाजवळ डायनासॉर काळातील जीवाश्म सापडले असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू

संघाची जोधपूरमध्ये ५ ते ७ सप्टेंबरदरम्यान बैठक

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक अखिल भारतीय समन्वय बैठक यंदा ५ ते ७ सप्टेंबर या कालावधीत

हैदराबादमध्ये क्रौर्याचा कळस! पतीने गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाचे केले तुकडे

हैदराबाद: तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका अत्यंत धक्कादायक घटनेने सगळ्यांनाच हादरवून सोडले आहे. एका पतीने