Social Media : सोशल मीडियावर टाकलेल्या लग्नाच्या फोटोंमुळे १७ वर्षीय मुलीची नरकातून सुटका

राजस्थानमधील तस्करीचा भयंकर प्रकार उघड


मैनपुरी : एका साध्या सोशल मीडिया (Social Media) पोस्टमुळे १७ वर्षीय मुलीच्या आठ महिन्यांच्या दुर्दैवी नरकाच्या प्रवासाचा शेवट झाला. राजस्थानमधील एका पुरुषाच्या ऑनलाइन लग्नाच्या फोटोंमुळे तिच्या तस्करीचा आणि अत्याचाराचा भयंकर गुंता पोलिसांनी उलगडला.


या घटनेला १८ मे २०२४ पासून सुरुवात झाली. मैनपुरी येथील कोचिंग क्लासला जात असताना, ओळखीच्या एका पुरुषाने या मुलीचे अपहरण केले. तिला वेटिंग कारमध्ये जबरदस्तीने बसवून गुंगीचे औषध देण्यात आले. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुढील आठ महिन्यांत, तिला एक शहर सोडून दुसऱ्या शहरात तस्करी करण्यात आले. या काळात तिच्यावर अनेकदा बलात्कार झाला, विक्री केली गेली आणि पुन्हा विकण्यात आले. शेवटी, तिला राजस्थानच्या अजमेरमध्ये पोहोचवण्यात आले. जिथे विष्णू माळी नावाच्या व्यक्तीने तिला ३.५ लाख रुपयांना विकत घेतले. तो तरुण स्वतःसाठी एक "वधू" शोधत होता.



ब-याच प्रयत्नानंतर वधू सापडल्याने विष्णू माळीने लग्नाच्या उत्साहात त्याचे आणि त्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हाच फोटो मैनपुरीपर्यंत पोहोचला आणि काही महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीची ओळख उघड झाली. स्थानिक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत राजस्थान पोलिसांच्या मदतीने विष्णू माळीला अटक केली आणि मुलीला सुखरूप परत आणले.


पोलीस तपासात उघड झाले की, नीरज नावाच्या व्यक्तीने तिला पहिल्यांदा अपहरण करून इटावामध्ये नेले. तेथे तिला ड्रग्ज देऊन बलात्कार करण्यात आला आणि आग्र्यातील रवी व बॉबी नावाच्या व्यक्तींना विकण्यात आले. यानंतर, तिला अजमेरमध्ये तस्करी करण्यात आले आणि स्थानिक आशा जैन या महिलेने तिला पुन्हा विकले. अखेर, विष्णू माळीशी तिचे जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले.


माळीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले की, त्यांना योग्य मुलगी मिळण्यात अडचण येत असल्याने त्यांनी "वधू खरेदी" केली.


दरम्यान, मुलीच्या कुटुंबीयांनी अनेक महिने आपल्या मुलीचा शोध घेतला आणि हरवलेली मुलगी शोदण्यासाठी पोलिसांकडे वारंवार मदत मागितली.


या प्रकरणावर मैनपुरीचे पोलीस अधिक्षक (ग्रामीण) अनिल कुमार म्हणाले, की, "सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, तपासात मानवी तस्करी आणि लैंगिक शोषणाचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. सर्व आरोपींवर बलात्कार, अपहरण, मानवी तस्करी आणि पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल."


सध्या मुलगी सुरक्षित आहे, मात्र मानसिक आघातातून सावरण्यासाठी तिच्यावर उपचार सुरू आहेत. असे असले तरी या घटनेने पुन्हा एकदा देशातील मानवी तस्करीच्या भयावह वास्तवाकडे लक्ष वेधले आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच