GBS Update : पुणे, मुंबई नंतर आता नागपूरातही एका रुग्णाचा मृत्यू; राज्यात मृतांचा आकडा १० वर पोहचला!

नागपूर : नागपुरात GBS आजाराने आणखी एका रुग्णाचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मुंबईनंतर नागपूरमध्येही एका रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. GBS च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.



मुंबईतील नायर रुग्णालयात GBS आजाराने बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच आता नागपूर येथील पार्डी परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय रुग्णाचा GBSने बळी घेतला आहे. रुग्णाला ११ फेब्रुवारी रोजी पक्षाघाताचा झटका आल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णाचे दोन्ही हात आणि पाय पक्षाघातामुळे लुळे पडले. त्याला श्वास घ्यायला आणि रक्तदाबाचा त्रासही होत होता.


शुक्रवारी या रुग्णाची प्रकृती खराब झाली असता त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान पुण्यात ८, मुंबईत १ आणि नागपूरमध्ये १ अशा १० रुग्णांचा मृत्यू GBS मुळे झाला आहे. यावर सरकार ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Comments
Add Comment

शतप्रतिशत भाजपसाठी रणनीती; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची राज्यस्तरीय संचालन समिती जाहीर

महत्वाच्या पदांवर अनुभवी नेतृत्व; विविध समाजघटकांसाठी स्वतंत्र संपर्क प्रमुख केशव उपाध्ये, नवनाथ बन यांच्यावर

Jalna Crime : 'तेच घडलं ज्याची भीती होती!' सख्या दीर-भावजयच्या 'लफड्याची' गावभर चर्चा; अनैतिक संबंधात अडथळा ठरलेल्या पतीचा निर्घृण खून, बदनापूर परिसरात खळबळ

जालना : अनैतिक प्रेमसंबंधात (Illegal Relationship) अडथळा ठरणाऱ्या सख्ख्या भावाचा दुसऱ्या भावानेच काटा काढल्याची एक धक्कादायक

Chhatrapati Sambhaji Nagar : गाझा मदतीच्या नावाखाली देशाच्या सुरक्षेशी खेळ? QRने गोळा केलेले लाखो रुपये थेट परदेशात; एटीएसकडून एकाला अटक, काय घडतंय नेमकं?

छत्रपती संभाजी नगर : गाझा-पॅलेस्टाईन येथे सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मदतीच्या

स्थानिक निवडणुकांतून ‘पिपाणी’ वगळली

केंद्रीय निवडणूक आयोगाचा शरद पवारांना दिलासा मुंबई  : शरद पवारांना केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी मोठा

एक कोटी लाडक्या बहिणींकडून केवायसी पूर्ण

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया १८ नोव्हेंबरपर्यंत

मुलं आणि शिक्षकांच्या मनाचा ठाव घेईल हे बालदिनाचे प्रभावी भाषण

दरवर्षी १४ नोव्हेंबर हा दिवस भारतभर “बालदिन” म्हणून मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा दिवस आपल्या देशाचे