GBS Update : पुणे, मुंबई नंतर आता नागपूरातही एका रुग्णाचा मृत्यू; राज्यात मृतांचा आकडा १० वर पोहचला!

नागपूर : नागपुरात GBS आजाराने आणखी एका रुग्णाचा बळी घेतल्याची माहिती समोर आली आहे. पुणे मुंबईनंतर नागपूरमध्येही एका रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. GBS च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालं आहे.



मुंबईतील नायर रुग्णालयात GBS आजाराने बळी गेल्याची बातमी ताजी असतानाच आता नागपूर येथील पार्डी परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय रुग्णाचा GBSने बळी घेतला आहे. रुग्णाला ११ फेब्रुवारी रोजी पक्षाघाताचा झटका आल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णाचे दोन्ही हात आणि पाय पक्षाघातामुळे लुळे पडले. त्याला श्वास घ्यायला आणि रक्तदाबाचा त्रासही होत होता.


शुक्रवारी या रुग्णाची प्रकृती खराब झाली असता त्याला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान या रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. दरम्यान पुण्यात ८, मुंबईत १ आणि नागपूरमध्ये १ अशा १० रुग्णांचा मृत्यू GBS मुळे झाला आहे. यावर सरकार ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल

Comments
Add Comment

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय

'हवाई वाहतूक ही अत्यंत महत्त्वाची आणि गांभीर्यची बाब'; खासदार सुप्रियाताई सुळेंचे वक्तव्य

नवी दिल्ली: मी विमान वाहतूक मंत्रालय यांचे आभार मानते. रोहित पवार यांनी हा विषय मुद्देसूद मांडला. आमच्या घरातील

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार