26/11चा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेकडून भारताकडे हस्तांतरण होणार

वॉशिंग्टन डी. सी. : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मोदींनी गुरुवारी दौऱ्यादरम्यान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. या भेटीनंतर भारत आणि अमेरिका यांनी संयुक्त प्रसिद्धीपत्रक काढले. दोन्ही देशांनी संरक्षण, संशोधन, व्यापार अशा विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला. अतिरेक्यांच्या विरोधात सुरू असलेली लढाई आणखी तीव्र करण्याचाही निर्णय दोन्ही देशांनी घेतला. याप्रसंगी बोलताना ट्रम्प यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे हस्तांतरित करणार असल्याचे जाहीर केले. तहव्वूर राणा हा जगातील अतिशय वाईट प्रवृत्तीच्या लोकांपैकी एक असल्याचेही ट्रम्प म्हणाले.







तहव्वूर राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा व्यावसायिक आहे. त्याने व्यावसायिक कारण देत भारताचा दौरा केला. ताज, ओबेरॉयमध्ये राहून मुंबईतील अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची टेहळणी केली. तहव्वूर राणाच्या अतिरेकी हल्ल्यातील सहभागाबाबतचे पुरावे भारत सरकारने अमेरिकेला दिले आहेत. हे पुरावे हाती आल्यानंतर ट्रम्प यांनी तहव्वूर राणाचा ताबा भारताला देणार असल्याची घोषणा केली आहे.

Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात