बांगलादेशमध्ये हिंदूंवर हल्ले झाल्याचे 'युनो'च्या अहवालात उघड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये जुलै ते ऑगस्ट २०२४ या कालावधीत तत्कालीन शेख हसीना सरकारविरोधात तीव्र निदर्शने झाली होती. हे आंदोलन चिरडण्यासाठी शेख हसिना यांच्या नेतृत्वाखालील राजवट निदर्शकांवर पद्धतशीर हल्ले करण्यात आले. या अत्याचाराला ‘मानवतेविरुद्धचे गुन्हे’ असे संयुक्त राष्ट्रांच्या (युनो) मानवाधिकार कार्यालयाने आपल्या अहवालात नमूद केले आहे.



याच अहवालात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने बांगलादेशातील हिंदूवरील अत्याचाराकडे दुर्लक्ष केले. केवळ ‘अतिशयोक्त प्रचार’ म्हणून वारंवार हिंदूंवर हल्लेच झाले नाहीत, असे सांगितले, असे नमूद करण्यात आले असल्याने मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पर्दाफाश झाला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार कार्यालयाच्या तथ्य-शोधक अहवालात हिंदूंच्या प्रार्थनास्थळांवर झालेल्या हल्ल्यांसह हिंसक जमावाच्या हल्ल्यांचे पुरावे देऊन दावे खोडून काढल्याचे आहेत.



५ ऑगस्ट २०२४ रोजी बांगलादेशातील हिंसक निदर्शनांमुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी देशातून पलायन केले. देशाच्या १७ कोटी लोकसंख्येपैकी ८% हिंदू असलेल्या हिंदूंना प्राणघातक हल्ल्यांना सामोरे जावे लागले. त्यांची घरे, व्यवसाय व धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यात आली. शेख हसीना यांनी देशातून पलायन केल्यानंतर अराजकतेत अल्पसंख्याक हिंदूंवर २०० हून अधिक हल्ले झाले.
Comments
Add Comment

अखेर पाकच्या सरकारी विमान कंपनीचा लिलाव! कोणी घेतली एअरलाईन अन् भारताचा संबंध काय?

कराची: अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली पाकिस्तानची सरकारी विमान कंपनी पाकिस्तान इंटरनेशनल एयरलाइंस (PIA) च्या

जपानमधील कारखान्यात 'चाकू हल्ला' आणि 'विषारी द्रव' फवारले; १४ जण जखमी

मिशिमा: टोकियोच्या पश्चिमेला असलेल्या शिझुओका प्रीफेक्चरमधील मिशिमा शहरातील रबर कारखान्यात एका व्यक्तीने

कॅनडातील भारतीयांची स्थिती नाजूक! २० वर्षीय विद्यार्थ्याची कॉलेज कॅम्पसमध्ये गोळ्या झाडून हत्या

टोरंटो: बांगलादेशात दिपू चंद्र दास या हिंदू तरुणाची हत्या केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कॅनडातूनही एक धक्कादायक

उपचारासाठी रुग्णालयात तब्बल आठ तास प्रतीक्षा! अखेर भारतीय तरुणाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

एडमोंटन: उपचारासाठी तब्बल आठ तास प्रतीक्षा पाहिल्यानंतर अखेर मृत्यूला जवळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मूर्ती पाडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर सुरक्षेचे कारण; भगवान विष्णूंच्या 'त्या' मूर्तीबाबत स्पष्टीकरण

बॅंकॉक: थायलंड आणि कंबोडिया यांच्यातील सीमावादावरून थाई लष्कराने भगवान विष्णूंची एक मूर्ती पाडल्याची घटना

तारिक रहमान १७ वर्षांनी मायदेशी परतले; बांगलादेशातील राजकीय चर्चांना उधाण

ढाका: बांगलादेशमध्ये मागील अनेक दिवसांपासून राजकीय गोंधळ सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळात