महाकुंभमुळे प्रयागराजमध्ये १५ फेब्रुवारीपर्यंत ८वीपर्यंतच्या शाळा बंद

प्रयागराज: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभमध्ये दररोज कोट्यावधीच्या संख्येने भाविक स्नानासाठी येत आहे. येथील मोठ्या प्रमाणातील गर्दी पाहता प्रयागराजमध्ये ८वीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रचंड गर्दीमुळे प्रयागराजमध्ये आठवीपर्यंतच्या शाळा आता १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार आहे. आठवीपर्यंतच्या शाळा आता १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून आठवीपर्यंतचे वर्ग हे ऑनलाईन पद्धतीनेच घेतले जात आङे.



बुधवारी संध्याकाळी दोन कोटींहून अधिक भाविकांचे स्नान


महाकुंभमध्ये पाचवे स्नान पर्व माघी पोर्णिमेला होते. यावेळेस बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल २ कोटीहून अधिक लोकांनी गंगा आणि संगमामध्ये पवित्र डुबकी घेतली. या दरम्यान स्नान करणाऱ्या भक्तांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टि करण्यात आली.



१३ जानेवारीपासून ते आतापर्यंत ४८.२५ कोटीहून अधिक लोकांनी केले स्नान


मेळावा प्रशानाच्या आकडेवारीनुसार बुधवारी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल २ कोटीहून अधिक लोकांनी संगमात तसेच गंगेमध्ये स्नान केले. महाकुंभची सुरूवात १३ जानेवारीला झाली आहे. आतापर्यंत ४८.२५ कोटीहून अधिक लोकांनी येथे स्नान केले आहे.

Comments
Add Comment

ऊर्जा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पंतप्रधान मोदींचे जागतिक गुंतवणूकदारांना आमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक गुंतवणूकदारांना भारताच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले

होर्मुझमध्ये अडकलेल्या भारतीय कॅप्टनचा मृत्यू; १८ दिवस समुद्रात अडकून वैद्यकीय मदतीअभावी दुर्दैवी अंत

पश्चिम आशियातील तणावाचा मानवी परिणाम समोर आला असून होर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकलेल्या ‘अवाना’ जहाजाचे कॅप्टन

पश्चिम आशियात तणाव वाढला; पंतप्रधान मोदींनी केली आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा

- ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ल्यांचा भारताकडून तीव्र निषेध पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर

गोव्याचे मुख्यमंत्री लेकीला भेटायला पुण्यात आले अन् रुग्णालयात अॅडमिट झाले, नेमकं झालं काय?

पुणे: गुढी पाडव्यानिमित्ताने आपल्या मुलीला भेटण्यासाठी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत पुण्यात आले होते.

Stormy weather : वादळी हवामानाचा अनेक उड्डाणांवर परिणाम; एअरलाइनकडून प्रवाशांसाठी ट्रॅव्हल ऍडव्हायझरी जारी

नवी दिल्ली : देशातील दोन प्रमुख शहरे दिल्ली आणि बंगळुरू येथे मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा

Iran-US-Israel War : इराण - कतार तणावाचा थेट भारताला फटका; वीज उत्पादन धोक्यात

मध्य पूर्वात भडकलेल्या युद्धाची झळ आता भारताच्या स्वयंपाकघरांपासून ते कारखान्यांपर्यंत पोहोचली आहे. इराणने