६५ वर्षांवरील रिक्षा-टॅक्सी चालकांना १० हजार मिळणार!

ऑटो रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना


मुंबई : आनंद दिघे साहेबांच्या जयंती दिनी म्हणजेच २७ जानेवारी २०२५ रोजी तत्कालिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून या मंडळाची स्थापना करण्यात आली होती. यासाठी राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देऊन या महामंडळाची सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल अशा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते.



या मंडळाच्या माध्यमातून लाखो रिक्षा आणि ऑटो चालकांसाठी भविष्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत. राज्यभरातील सर्व रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना ५००/- रुपये नोंदणी शुल्क आणि ३००/- रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्य होता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासद नोंदणी करता येईल. निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत ६५ वर्षावरील सभासद ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये ‘सन्मान निधी’ दिला जाणार आहे.

Comments
Add Comment

जनगणना २०२७च्या पूर्वचाचणीसाठी चेंबूरमध्ये १३५ प्रगणक, २२ पर्यवेक्षकांची नेमणूक

मुंबई (खास प्रतिनिधी) - जनगणनेच्या तयारीचा एक भाग म्हणून, मुंबई महानगरपालिकेच्या एम पश्चिम विभागात पूर्वचाचणी

राणीबागेत बोन्साय आणि ओरिगामी कला प्रदर्शन

मुंबई (खास प्रतिनिधी) : निसर्गसौंदर्य आणि सर्जनशीलतेचा अनोखा मिलाफ नोव्हेंबरच्या अखेरीस मुंबईकरांना अनुभवायला

मंडाळे आशियातील सर्वात मोठा आणि आधुनिक मेट्रो डेपो !

मुंबई : मुंबईच्या मेट्रो वाहतूक यंत्रणेत नवा अध्याय सुरू होत आहे. डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो लाईन २ बी साठी मंडाळे

“जो जीता वही सिकंदर” शरद पवारांच्या बिनबुडाच्या आरोपानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पलटवार!

मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाल्याचं चित्र समोर

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन