मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मोठे पाऊल

इंफाळ: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने राष्ट्रपती राजवटीसंबंधी अधिसूचना जारी केली आहे. एम बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्‍यांची प्रतीक्षा होती. यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.



एन बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा


मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा यावेळेस आला होता जेव्हा विधानसभेत काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव येणार होता. राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी २०२५ला राजीनामा दिला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि अर्धसैनिक बलाच्या अधिकाऱ्यांनी आज राजभवनात बैठक घेतली होती. या दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांना सीआरपीएफ तैनातीबाबत माहिती दिली.



हिंसाचारादरम्यान बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा


दरम्यान, राज्यपाल अजय भल्ला यांनी रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर सोमवारपासून सुरू होणारे बजेट अधिवेशन निलंबित केले. बिरेन सिंह यांनी आपल्या सरकारचा अविश्वास प्रस्ताव आणि महत्त्वपूर्ण फ्लोर टेस्टचा सामना करण्याच्या एक दिवस आधी पद सोडले. मणिपूर २०२३मध्ये जातीय हिंसाचार भडकल्यानंतर साधारण २ वर्षांनी आणि विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावादरम्यान त्यांचा राजीनामा आला.

Comments
Add Comment

Republic day parade: यंदा कर्तव्यपथावर अवतरणार गणपती बाप्पा

नवी दिल्ली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर यंदा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ठळकपणे दिसणार आहे.

Pension Scheme India : पेन्शनधारकांना सरकारने दिलयं मोठ गिफ्ट..नक्की काय ?

Pension Scheme India: केंद्र सरकारने पेन्शनधारकांसाठी दिलासादायक निर्णय घेत अटल पेन्शन योजनेचा वेळ वाढवण्याची मंजुरी दिली

Plane Crash News : हवेतच विमानाचे नियंत्रण सुटले अन् दोन्ही वैमानिकांचा...प्रयागराजमध्ये भीषण अपघात

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील प्रयागराज शहरात आज दुपारी भारतीय वायू सेनेच्या एका प्रशिक्षणार्थी विमानाला

Devendra Fadnavis at Davos : महाराष्ट्राची दावोसमध्ये ऐतिहासिक भरारी; 'थर्ड मुंबई' प्रकल्पासाठी ११ जागतिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार

दावोस : जागतिक आर्थिक परिषदेत (WEF 2026) महाराष्ट्र सरकारने राज्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड

भारत - यूएई करारांवर शिक्कामोर्तब

नवी दिल्ली : संयुक्त अरब अमिरातीचे (यूएई) राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांचा भारताचा अल्पकालीन

शबरीमाला सोने चोरी प्रकरणात 'ईडी’कारवाई

तीन राज्यांमध्ये २१ ठिकाणी छापेमारी नवी दिल्ली : केरळमधील पवित्र सबरीमाला अय्यप्पा मंदिराशी संबंधित सोने चोरी