मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू, मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मोठे पाऊल

इंफाळ: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. गृहमंत्रालयाने राष्ट्रपती राजवटीसंबंधी अधिसूचना जारी केली आहे. एम बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर नव्या मुख्यमंत्र्‍यांची प्रतीक्षा होती. यातच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.



एन बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा


मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा यावेळेस आला होता जेव्हा विधानसभेत काँग्रेसकडून अविश्वास प्रस्ताव येणार होता. राज्याचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी ९ फेब्रुवारी २०२५ला राजीनामा दिला होता. यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला आणि अर्धसैनिक बलाच्या अधिकाऱ्यांनी आज राजभवनात बैठक घेतली होती. या दरम्यान अधिकाऱ्यांनी त्यांना सीआरपीएफ तैनातीबाबत माहिती दिली.



हिंसाचारादरम्यान बिरेन सिंह यांनी दिला होता राजीनामा


दरम्यान, राज्यपाल अजय भल्ला यांनी रविवारी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्यानंतर सोमवारपासून सुरू होणारे बजेट अधिवेशन निलंबित केले. बिरेन सिंह यांनी आपल्या सरकारचा अविश्वास प्रस्ताव आणि महत्त्वपूर्ण फ्लोर टेस्टचा सामना करण्याच्या एक दिवस आधी पद सोडले. मणिपूर २०२३मध्ये जातीय हिंसाचार भडकल्यानंतर साधारण २ वर्षांनी आणि विरोधी पक्षाच्या वाढत्या दबावादरम्यान त्यांचा राजीनामा आला.

Comments
Add Comment

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर