Ganeshotsav 2025 : गणरायाच्या मूर्तींबाबत पालिकेचा मोठा निर्णय!

  77

मुंबई : नुकतेच माघी गणेशोत्सव राज्यभरात पार पडला. यावेळी कांदिवलीत प्रसिद्ध असणारा चारकोपच्या राजाची मूर्ती पीओपीची असल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. पर्यावरणाला हानिकारक असलेली पीओपी मूर्ती समुद्राला मोठ्या प्रमाणात अशुद्ध करू शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या मूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. विसर्जन न झालेली ही एकच मूर्ती नसून मुंबईतील अशा ११ मुर्त्यांचे विसर्जन थांबवले गेले होते. दरम्यान यावर महानगरपालिकेने तोडगा काढत मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करून देऊन त्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आदेश दिले. मात्र पीओपीच्या मूर्तींवर बंदी असली तरीही अनेक मंडळ पीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे याबाबत आता पालिकेने कठोर निर्णय हाती घेतला आहे. (Ganeshotsav 2025)



पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाला ६ महिने शिल्लक असताना या पार्श्वभूमीवर सण-उत्सवा संबंधित बाप्पाच्या मूर्ती या शाडू मातीच्याच हव्या, असे स्पष्ट केले आहे. मुंबईत पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून, त्यासाठी पालिकेकडूनच मोफत आणि गरज असेल तितकी माती मूर्ती कलाकार आणि व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार आहे.



गणेशमूर्तींच्या उंचीवरही घेणार निर्णय


प्रशासनाकडून पीओपी मूर्तींबाबत निर्णय घेतला असताना आता गणरायाच्या गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेकदा मूर्तींच्या उंचीमुळे मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करता येत नाही. त्यामुळे मूर्तीच्या उंचीसंदर्भातही निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. (Ganeshotsav 2025)

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.