Ganeshotsav 2025 : गणरायाच्या मूर्तींबाबत पालिकेचा मोठा निर्णय!

मुंबई : नुकतेच माघी गणेशोत्सव राज्यभरात पार पडला. यावेळी कांदिवलीत प्रसिद्ध असणारा चारकोपच्या राजाची मूर्ती पीओपीची असल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. पर्यावरणाला हानिकारक असलेली पीओपी मूर्ती समुद्राला मोठ्या प्रमाणात अशुद्ध करू शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या मूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. विसर्जन न झालेली ही एकच मूर्ती नसून मुंबईतील अशा ११ मुर्त्यांचे विसर्जन थांबवले गेले होते. दरम्यान यावर महानगरपालिकेने तोडगा काढत मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करून देऊन त्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आदेश दिले. मात्र पीओपीच्या मूर्तींवर बंदी असली तरीही अनेक मंडळ पीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे याबाबत आता पालिकेने कठोर निर्णय हाती घेतला आहे. (Ganeshotsav 2025)



पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाला ६ महिने शिल्लक असताना या पार्श्वभूमीवर सण-उत्सवा संबंधित बाप्पाच्या मूर्ती या शाडू मातीच्याच हव्या, असे स्पष्ट केले आहे. मुंबईत पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून, त्यासाठी पालिकेकडूनच मोफत आणि गरज असेल तितकी माती मूर्ती कलाकार आणि व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार आहे.



गणेशमूर्तींच्या उंचीवरही घेणार निर्णय


प्रशासनाकडून पीओपी मूर्तींबाबत निर्णय घेतला असताना आता गणरायाच्या गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेकदा मूर्तींच्या उंचीमुळे मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करता येत नाही. त्यामुळे मूर्तीच्या उंचीसंदर्भातही निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. (Ganeshotsav 2025)

Comments
Add Comment

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा

कृषी योजनांसाठी ८ महिन्यांत ३५ टक्के निधी खर्च; विधान परिषदेत दत्ता भरणे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कृषी विभागाच्या राज्य पुरस्कृत योजनांसाठी गेल्या आठ महिन्यांत एकूण ८०९८.४१ कोटी रुपयांची

बदलापूर प्रकरणाची विधान परिषदेत दखल; स्कूल बस नियमावलीच्या कडक अंमलबजावणीचे आदेश

मुंबई : बदलापूर येथील एका शाळेत घडलेल्या विनयभंग प्रकरणाचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले असून, राज्य सरकारने

शेतकरी आणि मजुरांना बिबट्यांपासून मिळणार सुरक्षा; विधान परिषदेत सरकारचा मास्टर प्लॅन

मुंबई : राज्यात वाढलेला बिबट्यांचा वावर आणि त्यामुळे होणारी जीवितहानी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्याधुनिक