Ganeshotsav 2025 : गणरायाच्या मूर्तींबाबत पालिकेचा मोठा निर्णय!

मुंबई : नुकतेच माघी गणेशोत्सव राज्यभरात पार पडला. यावेळी कांदिवलीत प्रसिद्ध असणारा चारकोपच्या राजाची मूर्ती पीओपीची असल्यामुळे हे प्रकरण चर्चेत आले. पर्यावरणाला हानिकारक असलेली पीओपी मूर्ती समुद्राला मोठ्या प्रमाणात अशुद्ध करू शकते. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने या मूर्तीचे विसर्जन करण्यास मनाई केली होती. विसर्जन न झालेली ही एकच मूर्ती नसून मुंबईतील अशा ११ मुर्त्यांचे विसर्जन थांबवले गेले होते. दरम्यान यावर महानगरपालिकेने तोडगा काढत मंडळांना कृत्रिम तलाव निर्माण करून देऊन त्यामध्ये गणेश मुर्त्यांचे विसर्जन करण्याचे आदेश दिले. मात्र पीओपीच्या मूर्तींवर बंदी असली तरीही अनेक मंडळ पीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे याबाबत आता पालिकेने कठोर निर्णय हाती घेतला आहे. (Ganeshotsav 2025)



पालिकेतील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवाला ६ महिने शिल्लक असताना या पार्श्वभूमीवर सण-उत्सवा संबंधित बाप्पाच्या मूर्ती या शाडू मातीच्याच हव्या, असे स्पष्ट केले आहे. मुंबईत पीओपीच्या मूर्तींसाठी कठोर बंदी कायम राहणार असून, त्यासाठी पालिकेकडूनच मोफत आणि गरज असेल तितकी माती मूर्ती कलाकार आणि व्यावसायिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठीची नोंदणी प्रक्रिया १ मार्चपासून सुरू होणार आहे.



गणेशमूर्तींच्या उंचीवरही घेणार निर्णय


प्रशासनाकडून पीओपी मूर्तींबाबत निर्णय घेतला असताना आता गणरायाच्या गणेशमूर्तींच्या उंचीसंदर्भातही महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळत आहे. अनेकदा मूर्तींच्या उंचीमुळे मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करता येत नाही. त्यामुळे मूर्तीच्या उंचीसंदर्भातही निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगितले जात आहे. (Ganeshotsav 2025)

Comments
Add Comment

मुंबई विमानतळावर बनावट भारतीय पासपोर्टवर फिरताना आढळले नेपाळी आणि बांगलादेशी नागरिक

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अलीकडेच दोन परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली

मराठा समाजाच्या दोन आरक्षणावर न्यायालयाचा सवाल

एसईबीसीअंतर्गत १० टक्के, की ओबीसीमधून मिळणार आरक्षण मराठा आरक्षणावर ४ ऑक्टोबरला पुढील सुनावणी आरक्षणावरून

मुंबईत मद्यपी तरुणीमुळे अपघात, फुटपाथवर गेली कार आणि...

मुंबई : मद्यपी तरुणीने बेदरकारपणे कार चालवली आणि अपघात झाला. दुभाजकाचा कठडा तोडून कार फुटपाथवर (पदपथ) झोपलेल्या

मुंबईकरांना यंदा पाण्याचे ‘नो टेन्शन’

पुरवठा करणाऱ्या धरण, तलाव क्षेत्रांतील पाणीसाठा ९८.४० टक्के शेवटच्या १७ दिवसांत १.६० टक्के साठ्याचे

Rain Update : आठवड्याच्या शेवटी पावसाने धरला जोर, अनेक ठिकाणी कोसळधारा, हवामान खात्याचा अलर्ट

मुंबई: सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्याच्या शेवटच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. पावसाच्या जोरदार सरी कोसळत

बांद्रा टर्मिनसजवळ बेकायदेशीर झूंजीतून वाचवलेल्या मेंढ्यांना 'पेटा इंडिया'कडे सोपवले

मुंबई: बांद्रा टर्मिनसजवळ एका बेकायदेशीर झूंजीत वापरल्या गेलेल्या दोन मेंढ्यांना 'पीपल फॉर द एथिकल ट्रीटमेंट ऑफ