लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, मुख्यमंत्र्यांची आश्वासनपर ग्वाही

  81

लाडकी बहीण अपात्र योजनेसाठी निराधार योजनेतून मदत देणार


मुंबई (प्रतिनिधी) : "लाडकी बहीण योजना ही आमच्यासाठी केवळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या जगण्याचा आधार आहे", असे धुणी भांडी करणाऱ्या महिलांनी सांगताच" ही योजना कधीही बंद पडणार नाही। अशी आश्वासनपर ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली, यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी ladkiयेथील धुणी भांडी काम करणाऱ्या २० महिलांना रसिकाश्रम या संस्थाने "जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी" या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घडविली.


मुख्यमंत्र्यांसह झालेल्या भेटीदरम्यान अनेक महिलांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. "भांडे घासून मिळणाऱ्या ५०० रुपयांत कुटुंब कस चालवायचं, याचा प्रश्न होता. पण 'लाडकी बहीण' योजनेने आम्हाला मोठा आधार मिळाला," असे म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत "लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, यापेक्षा अधिक मदत कशी करता विचार करतोय, असे आश्वासन दिले. या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती,तर जीवनभर लक्षात राहणारा असा अनुभव होता. आम्ही कधी विमान पाहिले नव्हते, त्यातून प्रवासही केला. गेल्या दोन दिवसांत आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली," असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले.



या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की, "सन्माननिधी म्हणून मिळणारे १० हजार रुपये दरवर्षी मिळावेत." यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत "शासन पातळीवर या मागणीचा विचार करू, असे सांगितले. तसेच काही वृद्ध महिला 'लाडकी बहीण' योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना 'निराधार योजना' अंतर्गत मदत देण्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या भेटीचे आयोजन "रसिकाश्रय" संस्थेने केले होते. "या महिलांच्या संघर्षाची जाणीव करून दिल्याबद्दल संस्थेचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अभिनंदन केले. राज्यातील गरीब जनतेचे जीवन सुसह्य करम्यासाठी कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.