आपणासी आपण व्याले रे...

सद्गुरू वामनराव पै


परमेश्वर कसा आहे हे सांगताना आम्ही नेहमी सांगतो की, परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी सत्, चित्, आनंद आहे. त्याच्या ठिकाणी असलेला हा आनंद स्फुरद्रुप आहे. आनंद कधीही एकटा राहणार नाही. तो सतत स्फुरत असतो म्हणून “एकोहं बहुस्याम् प्रजयायेम्” म्हटलेले आहे. “आपुलेच आवडी धरुनी खेळिया आप आपणाते व्याला रे” असे एके ठिकाणी नामदेव महाराजांनी म्हटलेले आहे. किती सुंदर म्हटले आहे बघा. “आपणासी आपण व्याले रे”. तो जो व्याला ना तो आपलीच आवड म्हणजे आनंद घेऊन व्याला. आवड हे आनंदाचे रूप आहे हे लक्षात ठेवायचे. प्रत्येक माणसाला कशाची ना कशाची आवड असते. त्याची ही आवड लक्षात घेऊन जर माणसाला प्रगती केली तर तो जगात मोठा होऊ शकतो. एखादा मुलगा अभियंता होण्याची आवड आहे, बाप वकील आहे पण मुलाला आवड अभियांत्रिकीची आहे.


बापाच्या भीतीने तो जर वकिलीला गेला तर तो फेल होईल आणि अभियांत्रिकीला गेला तर यशस्वी होईल. आपली आवड मुलांवर लादता कामा नये. आजकाल काय झालेले आहे की, आई-वडील ठरवितात मुलांना काय व्हायचं ते. मुलांनी कुठे जायचे. आता तर आई-वडिलांपेक्षा मित्रमैत्रिणी ठरवतात. पूर्वी आई-वडील ठरवत होते आता मित्रमैत्रिणी काय सांगतात यावर त्या मुलाचा जास्त विश्वास असतो. मित्र इंजिनीयरिंगला गेले तिथे आपण जावूया. मित्र कॉमर्सला गेले तिथे आपण जावूया. अशाने होते काय आवड असते एक व आपण दुसरीकडेच गेलो तर तिथे आपण यशस्वी होऊ शकत नाही.


मुलांना जर त्यांच्या आवडीप्रमाणे जीवनासत जाण्याचा मार्ग अवलंबिला तर ते प्रगती करू शकतील. सांगायचा मुद्दा काय आवड हे त्या आनंदाचे रूप आहे. प्रत्येक मुलाला, प्रत्येक माणसाला, प्रत्येक व्यक्तीला कशाची ना कशाची तरी आवड असते, कारण का? त्याच्या ठिकाणी आनंद असतो म्हणून. खरे तर आपण त्याला स्वानंद म्हणतो. स्वानंद व आनंद यात फरक आहे. स्वानंद हाच आनंदावर येतो. हा आनंद आपण जेव्हा दुसऱ्याला देतो तेव्हा होते ते सुख व हे सुख जेव्हा परिवर्तित होऊन आपल्याकडे परत येते तेव्हा आपल्याला होते ते समाधान. लक्षांत आले की नाही, हा स्वानंद आपल्याकडेच आहे.

Comments
Add Comment

Ujjain Mahakaleshwar : महाकालच्या भक्तांसाठी खुशखबर ! आता घरबसल्या घ्या भस्म आरतीचं दर्शन

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उज्जैनच्या श्री महाकालेश्वराच्या दर्शनानं आपल्या आयुष्यातील संकटे आणि

जाणून घ्या चैत्र नवरात्रीत देवीची पूजा, विधी कसे करावेत ? आणि कोणत्या गोष्टी असतात लाभदायक

मुंबई : गुढीपाडवा हा हिंदू पंचांगातील महत्वाचा सण आहे. या सणापासून चैत्र महिन्याला सुरुवात होते. आणि गुडीपाडवा या

एकादशीच्या दिवशी 'या' गोष्टी केल्यास भगवान विष्णू होतील प्रसन्न !

धार्मिक मान्यतेनुसार हिंदू धर्मात एकादशी व्रताचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी मनोभावे पूजा

गुढीपाडवा का साजरा केला जातो? जाणून घ्या गुढीपाडव्याचे महत्त्व, पूजा विधी आणि परंपरा

मुंबई : महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. साडेतीन

कधी आहे पापमोचनी एकादशी ? काय आहे या दिवसाचे महत्त्व ? कशी करावी या दिवशी पूजा ?

मुंबई : हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील अकरावी तिथी म्हणजे एकादशी. हा दिवस

कधी आहे नृसिंह द्वादशी ? त्या दिवशी नेमके काय करावे ?

भगवान विष्णूचा चौथा अवतार म्हणजेच भगवान नृसिंह यांची द्वादशी ही यंदा शुक्रवार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी दहा