Pune : पुण्यातील शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने उडाली तारांबळ!

पुणे : पुण्यातील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल आल्याने एकच खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास केला असता कुठेही बॉम्ब नसल्याचे समोर आले.



मिळालेल्या माहितीनुसार, बावधन जवळील सुस रोड येथील एका खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल गुरुवारी सकाळी शाळेच्या मुख्याध्यापिकेला प्राप्त झाला. याबाबत मुख्याध्यापिकेने तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला माहिती दिल्यानंतर स्थानिक पोलीस व बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्व शाळेची तपासणी करण्यात आली. मात्र, कुठेही बॉम्ब नसल्याचे समोर आले. दरम्यान, पोलिसांनी घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे.


घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी सर्वात आधी सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित झोनमध्ये नेऊन शाळेची तपासणी केली. मात्र काहीही न आढळल्याने हा कोणीतरी खोडकरपणा केला असावा असा पोलिसांनी अंदाज व्यक्त केला आहे.


दरम्यान, हा मेल कोणी केला याबाबत प्रश्न अजूनही कायम आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा