Political Breaking News : शरद पवारांनी केले एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक!

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर आमने सामने आले. या भेटी दरम्यान शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या घटनेनंतर उबाठा गटात नाराजी निर्माण झाली आहे.


सध्या राजकारणातील आकडेमोड कधी बदलतील हे सांगता येण्याजोगं नाही. अशातच काल पार पडलेल्या सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.



काय म्हणाले शरद पवार ?


शरद पवार म्हणाले," नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदेंचं नाव समोर येत. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य दिशा देण्याचे काम केले. त्यांनी सर्वच पक्षांशी नेहमी सुसंवाद साधून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल."



काय म्हणाले एकनाथ शिंदे ?


शरद पवार यांनी भाषणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गोड कौतुक केल्यानंतर शिंदेंनीही त्यांची भाषणातून त्यांची फिरकी घेतली. "पवारांची गुगली कोणाला कधी समजली नाही, त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांनाही ती समजली नाही माझे आणि पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते माझ्यावर कधी गुगली टाकणार नाहीत." असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नवं वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा

मतदारयादी सुधारणा हा आयोगाचा विशेषाधिकार

केंद्रीय निवडणूक आयोगाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण नवी दिल्ली : देशभरात वेळोवेळी मतदारयादी सुधारणा करणे

‘ऑपरेशन सिंदूर’वेळी काँग्रेसकडून पाकिस्तानच्या लष्कराची पाठराखण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल गुवाहाटी : काँग्रेस नेहमीच भारतविरोधी शक्तींच्या पाठीशी उभी राहते आणि

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू