Political Breaking News : शरद पवारांनी केले एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक!

नवी दिल्ली : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल एकाच मंचावर आमने सामने आले. या भेटी दरम्यान शरद पवारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंडभरून कौतुक केलं आहे. या घटनेनंतर उबाठा गटात नाराजी निर्माण झाली आहे.


सध्या राजकारणातील आकडेमोड कधी बदलतील हे सांगता येण्याजोगं नाही. अशातच काल पार पडलेल्या सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सन्माननीय व्यक्तींचा गौरव करण्यात आला. यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शरद पवारांच्या हस्ते ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान झालेल्या भाषणात शरद पवार यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं.



काय म्हणाले शरद पवार ?


शरद पवार म्हणाले," नागरी प्रश्नांची जाण असणारा नेता कोण याची माहिती घेतली तर एकनाथ शिंदेंचं नाव समोर येत. ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका तसेच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी योग्य दिशा देण्याचे काम केले. त्यांनी सर्वच पक्षांशी नेहमी सुसंवाद साधून राज्य आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक केली. याची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात निश्चित होईल."



काय म्हणाले एकनाथ शिंदे ?


शरद पवार यांनी भाषणातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गोड कौतुक केल्यानंतर शिंदेंनीही त्यांची भाषणातून त्यांची फिरकी घेतली. "पवारांची गुगली कोणाला कधी समजली नाही, त्यांच्या बाजूला बसणाऱ्यांनाही ती समजली नाही माझे आणि पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ते माझ्यावर कधी गुगली टाकणार नाहीत." असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शरद पवारांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात नवं वादळ येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Comments
Add Comment

दार्जिलिंगमध्ये मुसळधार पावसाचा कहर; भूस्खलनात १७ जणांचा मृत्यू, सिक्कीमशी संपर्क तुटला

उत्तराखंड : दार्जिलिंगमध्ये झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले असून, आतापर्यंत १७

‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई : ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘शक्ती’ (Shakti) या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून, पुढील काही दिवसांत

फास्टॅगशिवाय रोखीने पैसे भरणाऱ्यांना १५ नोव्हेंबरपासून लागणार दुप्पट टोल

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टोल प्लाझाच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. वैध फास्टॅग असलेल्या वाहन

फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या कामाच्या धकाधकीत लोकांची झोपण्याची वेळ कमी होत चालली आहे. दिवसभरात बऱ्याच गोष्टी

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका