उपनेतेपदाचा दिला राजीनामा, राजन साळवी शिवसेनेच्या वाटेवर

रत्नागिरी : उद्धव ठाकरे गटाच्या उपनेतेपदाचा राजन साळवींनी राजीनामा दिला. ते लवकरच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. बाळासाहेबांच्या विचारांनी चालणाऱ्या शिवसेनेचा भगवा हाती घेण्याची तयारी राजन साळवींनी केल्याचे सूत्रांकडून समजते.



मागील अनेक दिवसांपासून राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या गटातून बाहेर पडणार असल्याची चर्चा होती. आता राजन साळवींनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे राजन आणि त्यांचे समर्थक उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.



राजन साळवी हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून २००९ ते २०२४ या काळात आमदार होते. शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या किरण सामंत यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राजन साळवींचा पराभव केला. याआधी राजन साळवी २००९, २०१४ आणि २०१९ असे सलग तीन वेळा विधानसभा निवडणुकीत राजापूरमधून विजयी झाले होते. आमदार असताना राजन साळवींनी महाविकास आघाडीकडून २०२२ मध्ये विधानसभाध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत महायुतीच्या राहुल नार्वेकरांचा विजय झाला आणि साळवी पराभूत झाले होते.



राजन साळवींची कोकणातील लांजा, राजापूर आणि साखरपा परिसरात ताकद आहे. यामुळे राजन साळवींनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतल्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची कोकणातील ताकद वाढण्यास मदत होईल. उद्धव ठाकरे गटाची राजकीय ताकद आणखी कमी होईल; अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरेंनी कोकणात विनायक राऊत यांना जास्त महत्त्व दिले. यावरुन राजन साळवी आणि विनायक राऊत यांच्यात मतभेद झाले. या मतभेदांमुळेच राजन साळवींनी उद्धव यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
Comments
Add Comment

नदीजोड प्रकल्पांची कामे कालमर्यादेत पूर्ण करा -ना.विखे पाटील

कोकण-गोदावरीसह चार महत्त्वाच्या योजनांचा घेतला आढावा मुंबई: राज्यातील महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पांची कामे

Nagpur-Madgaon Biweekly Train Regular : कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी! नागपूर-मडगाव द्विसाप्ताहिक एक्स्प्रेस आता नियमित धावणार

कोकण : मे महिन्याच्या सुट्ट्यांमध्ये तसेच भविष्यातही कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा

Sindhuratna Samruddhi Yojana 2.0 : 'सिंधुरत्न समृद्ध योजना २.०'ला मंजुरी

मंत्रिमंडळ बैठकीत तीन वर्षांच्या मुदतवाढीवर शिक्कामोर्तब; पालकमंत्र्यांकडे अध्यक्षपद, कोकणच्या सर्वांगीण

Raigad : रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्नशील : पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई: रायगड जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या पर्यटनांच्या कामांना गती

Revenue Minister Chandrashekhar Bawankule : कोकणातील आंबा-काजू बागायतदारांना वाऱ्यावर सोडणार नाही!

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू मुंबई : हवामान बदल आणि अवकाळी पावसामुळे

Nitesh Rane : कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना रोजगारात प्राधान्य द्या!

पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश; प्रकल्पबाधितांची स्वतंत्र यादी तयार करण्याच्या रेल्वे प्रशासनाला