Rain Alert : देशात तीन दिवसांत आठ राज्यांत पावसाची शक्यता

नवी दिल्ली : उत्तर भारतातील मैदानी भागातल्या थंडीची जागा आता उकाडा घेऊ लागला आहे. लवकरच देशातील अनेक राज्यांमध्ये उकाडा जाणवू लागेल. पण वातावरण बदलण्याच्या सुमारास देशातील आठ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम या आठ राज्यांमध्ये १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पावसाची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटात तसेच ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आठ राज्यांसाठी हवामान विभागाने वर्तविला आहे.



ईशान्य भारतात पाऊस पडणार असल्यामुळे मध्य भारतात थंडीची तीव्रता वाढेल. पूर्व भारतात तसेच वायव्य भारतात उकाडा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा तापमान २७ अंश से. च्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
Comments
Add Comment

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना