Rain Alert : देशात तीन दिवसांत आठ राज्यांत पावसाची शक्यता

  96

नवी दिल्ली : उत्तर भारतातील मैदानी भागातल्या थंडीची जागा आता उकाडा घेऊ लागला आहे. लवकरच देशातील अनेक राज्यांमध्ये उकाडा जाणवू लागेल. पण वातावरण बदलण्याच्या सुमारास देशातील आठ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम या आठ राज्यांमध्ये १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पावसाची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटात तसेच ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आठ राज्यांसाठी हवामान विभागाने वर्तविला आहे.



ईशान्य भारतात पाऊस पडणार असल्यामुळे मध्य भारतात थंडीची तीव्रता वाढेल. पूर्व भारतात तसेच वायव्य भारतात उकाडा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा तापमान २७ अंश से. च्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
Comments
Add Comment

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात २१ वर्षीय विद्यार्थीनी जखमी

लखनऊ : भटक्या कुत्र्यांचा हल्ला सध्या चर्चेत असून भटक्या कुत्र्यांच्या जीवघेण्या हल्ल्याच्या बातम्या अजूनही

ऐन सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना महागाईचा फटका, डाळी, रवा, मैदा, खाद्यतेल, साखरेचे भाव वधारले

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गणेश चतुर्थीला ३, ४ दिवस बाकी असून या सणादरम्यान लागणाऱ्या

भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षाचा शोध सुरुच

पदासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात विचारमंथन सुरू नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय

टोल कर्मचाऱ्यांची दादागिरी... ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानाला मारहाण केल्याप्रकरणी NHAI ची मोठी कारवाई

मेरठ: ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असलेल्या जवानावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी NHAI ने मोठी कारवाई केली असून संबंधित

कर्नाटकचे काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र यांना ईडीकडून अटक

छापेमारीत आढळले १२ कोटी रुपये, ६ कोटींचे सोने गंगटोक : कर्नाटक काँग्रेसचे आमदार के. सी. वीरेंद्र यांना सक्तवसुली

टिकटॉकवरील बंदी उठवली काय?

नवी दिल्ली : एकेकाळी तरुणाईला वेड लावणाऱ्या टिकटॉकच्या भारतातील पुनरागमनाच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरला