नवी दिल्ली : उत्तर भारतातील मैदानी भागातल्या थंडीची जागा आता उकाडा घेऊ लागला आहे. लवकरच देशातील अनेक राज्यांमध्ये उकाडा जाणवू लागेल. पण वातावरण बदलण्याच्या सुमारास देशातील आठ राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपुरा, सिक्कीम या आठ राज्यांमध्ये १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पावसाची आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटात तसेच ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आठ राज्यांसाठी हवामान विभागाने वर्तविला आहे.
ईशान्य भारतात पाऊस पडणार असल्यामुळे मध्य भारतात थंडीची तीव्रता वाढेल. पूर्व भारतात तसेच वायव्य भारतात उकाडा वाढेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दिल्ली एनसीआरमध्ये उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. दिवसा तापमान २७ अंश से. च्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…