Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला जुळणार ग्रहांचा संयोग ! 'या' राशींवर होणार भगवान शिवची कृपा

मुंबई : एका कालावधीनंतर प्रत्येक ग्रह आपल्या राशीत परिवर्तन करतो. अशावेळी युतीचा प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर (Mahashivratri 2025)दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. या दिवशी तीन राशींमध्ये सहा ग्रह विराजमान होणार आहेत. यामुळे शुक्र आणि गुरु ग्रह एकत्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.



त्याचबरोबर, बुध ग्रह मकर राशीत असणार आहे. या ठिकाणी सूर्य आणि शनीसुद्धा कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे चार राशीतील लोकांवर भगवान शिवची विशेष कृपा राहणार असून त्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



मेष रास


कुंभ राशीत तीन ग्रहांच्या होणाऱ्या युतीमुळे विशेष लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले काम देखील पूर्ण होईल.



वृषभ रास


वृषभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा चांगला लाभ मिळेल. सूर्य, चंद्र आणि शनीच्या युतीने या राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.



मकर रास


मकर राशीच्या दुसऱ्या चरणात युती होणार आहे. यामुळे या काळात तुम्हाला धन-संपत्तीची कोणतीच कमतरता भासणार नाही. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.



कुंभ रास


या राशीच्या विवाह चरणात त्रिग्रही योग जुळून येणार आहे. या राशीच्या लोकांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

हॉकी आशिया कपमध्ये भारतीय महिला संघ उपविजेता

अंतिम सामन्यात चीनकडून ४-१ ने पराभव बीजिंग : महिला हॉकी आशिया कपमध्ये भारतीय संघ उपविजेता राहिला. हांगझोऊ येथे

नेपाळ, फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्ये निदर्शन रॅली, लाखो लोकं रस्त्यावर

लंडन: नेपाळ आणि फ्रान्सनंतर आता आंदोलनाचे वारे ब्रिटनच्या रस्त्यावर देखील दिसून आले आहे. सर्वात महत्वाचे

महाराष्ट्रात सध्या मोठ्या प्रमाणावर कांद्याची विक्री नाही - नाफेड

मुंबई : नॅशनल ॲग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया लि.(नाफेड

"संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही": आनंद परांजपे

मुंबई: संजय राऊतसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही अशा शब्दात अजित पवार गटातील राष्ट्रवादी

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने