प्रहार    

Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला जुळणार ग्रहांचा संयोग ! 'या' राशींवर होणार भगवान शिवची कृपा

  125

Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीला जुळणार ग्रहांचा संयोग ! 'या' राशींवर होणार भगवान शिवची कृपा

मुंबई : एका कालावधीनंतर प्रत्येक ग्रह आपल्या राशीत परिवर्तन करतो. अशावेळी युतीचा प्रत्येक राशीवर शुभ आणि अशुभ परिणाम होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर (Mahashivratri 2025)दुर्लभ संयोग जुळून येणार आहे. या दिवशी तीन राशींमध्ये सहा ग्रह विराजमान होणार आहेत. यामुळे शुक्र आणि गुरु ग्रह एकत्र मीन राशीत प्रवेश करणार आहे.



त्याचबरोबर, बुध ग्रह मकर राशीत असणार आहे. या ठिकाणी सूर्य आणि शनीसुद्धा कुंभ राशीत असणार आहे. त्यामुळे चार राशीतील लोकांवर भगवान शिवची विशेष कृपा राहणार असून त्यांना याचा चांगलाच फायदा होणार आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी.



मेष रास


कुंभ राशीत तीन ग्रहांच्या होणाऱ्या युतीमुळे विशेष लाभ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले काम देखील पूर्ण होईल.



वृषभ रास


वृषभ राशीच्या लोकांना त्रिग्रही योगाचा चांगला लाभ मिळेल. सूर्य, चंद्र आणि शनीच्या युतीने या राशीच्या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळण्याची शक्यता आहे.



मकर रास


मकर राशीच्या दुसऱ्या चरणात युती होणार आहे. यामुळे या काळात तुम्हाला धन-संपत्तीची कोणतीच कमतरता भासणार नाही. तसेच, तुम्हाला अचानक धनलाभ मिळेल. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल.



कुंभ रास


या राशीच्या विवाह चरणात त्रिग्रही योग जुळून येणार आहे. या राशीच्या लोकांच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगला लाभ मिळेल.

Comments
Add Comment

मुलांची उंची वाढवण्यासाठी आणि हाडे मजबूत करण्यासाठी त्यांना द्या हा पौष्टिक आहार

मुंबई: मुलांची वाढ योग्य प्रकारे व्हावी यासाठी त्यांना पौष्टिक आहार देणे खूप महत्त्वाचे असते. चांगल्या उंचीसाठी

महिलांची जोखीम ओळखण्याची क्षमता समाजसुरक्षेसाठी महत्त्वाची — ॲड. राहुल नार्वेकर

सणासुदीच्या काळात महिलांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता समित्यांनी सज्ज राहावे —  नीलम गोऱ्हे मुंबई : विधानपरिषद

डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौ.फुटांचे घर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा डबेवाल्यांना दिलासा

मुंबई : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला डबेवाला समाजासाठी ऐतिहासिक घोषणा करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विघटनवादी शक्तींना दूर सारून विद्यार्थ्यांनी एकात्मतेसह अखंडतेचा ध्यास धरावा – मंगलप्रभात लोढा

मुंबई : भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या फाळणीच्या दाहकतेचा निषेध करत राज्यातल्या हजारो आयटीआयमध्ये विभाजन

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभाग महाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’

मुंबई : वांद्रे येथील जिओ कन्व्हेन्शन सेंटर येथे  ‘ट्रॅव्हल ट्रेड फेअर २०२५’  (टीटीएफ) या पर्यटनाशी निगडीत

लाँग वीकेंडमध्ये फिरायला जाण्याचा विचार करताय? मग गर्दी टाळण्यासाठी ही ठिकाणे टाळा!

मुंबई : स्वातंत्र्यदिन आणि जन्माष्टमीमुळे यंदा ऑगस्ट महिन्यात एक मोठा लाँग वीकेंड येत आहे.