Nitesh Rane : राज्यातील संस्था व मदरसे यांची उच्चस्तरीय चौकशी करावी; मंत्री नितेश राणे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : राज्यातील संशयीत संस्था व मदरसे यांची कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने एस.आय.टी. स्थापन करण्यात येवून उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.


नितेश राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, जामिया इस्लामिया इशातुल उलूम इन्स्टिट्यूट अक्कलकुवा, जिल्हा नंदुरबार यांचे अध्यक्ष व संस्थापक व इतर स्टाफ यांनी कोणत्याही प्रकारचा वैध व्हिजा नसताना आधार कार्ड, पॅन कार्ड, जन्म प्रमाणपत्र, बँक खाते अशा प्रकारचे महत्वाचे दस्तऐवज बनवून बेकायदेशीररित्या यमन नागरिकास वास्तव्यास ठेवून इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या व यमन देशातील कुटुंबीय आणि इतरां विरोधात बीएनएस, परदेशी कायदा आण दि टेलिग्राफ कायद्याच्या संबंधित कलमांखाली दिनांक ११.०२.२०२५ रोजी गु.र.नं.३०/२०२५ अन्वये अक्कलकुआ पोलीस ठाणे, जि. नंदुरबार येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



राज्यात सुरु असलेल्या सदरील संस्था व मदरश्यांमधून राष्ट्र विरोधी शिक्षण दिले जाणे, विशिष्ट धर्माच्या नागरिकांना बेकायदेशीररित्या आश्रय दिला जाणे, देश विरोधी कारवायांकरीता आर्थिक मदत पुरविली जाते. अशा प्रकारचे कार्य करणाऱ्या संशयीत संस्थांचा शोध घेण्यात येवून त्याच्या आर्थिक व्यवहाराची तपासणी करण्याची मागणी विविध स्तरावरुन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. संशयीत संस्था व सदरील मदरसे यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने एस.आय.टी. स्थापन करण्यात येवून उच्चस्तरीय चौकशी करण्याबाबत संबंधितांना आदेशित व्हावे,अशी मागणी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Comments
Add Comment

एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये बोगस

मुंबईत आता फेरीवाल्यांची झाडाझडती

महापौरांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांचे ओळखपत्रे आणि कागदपत्रे तपासणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने

महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?

मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश