Ratnagiri : रत्नागिरीत ८ मार्चपासून पाच दिवसांचा कृषी महोत्सव

रत्नागिरी : येथील कै. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात ८ ते १२ मार्च असे पाच दिवस कृषी प्रदर्शन होणार आहे. यामध्येच पशु-पक्षी प्रदर्शनदेखील भरविण्यात येणार आहे. आत्मा, कृषी, बँकर्स, जिल्हा परिषद कृषी-पशुसंवर्धन, जिल्हा नियोजन अशा सर्व विभागांनी एकत्रित येऊन समन्वयाने कृषी प्रदर्शन यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात कृषी प्रदर्शनाच्या पूर्वतयारीबाबत आज बैठक घेण्यात आली. बैठकीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, आत्माचे प्रकल्प संचालक विजय बेतीवार, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक मुकुंद खांडेकर, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी सूचित वंजारे आदी उपस्थित होते.



जिल्हाधिकारी म्हणाले, कृषी विद्यापीठ, बँकर्स, जिल्हा परिषद, कृषी विभाग, एनआरएलएम या सर्वांनी आपापले स्टॉल उभारून योजनांची माहिती द्यावी. शेतकरी, उत्पादक, महिला बचत गट यांच्यासाठी माहितीप्रदान परिसंवाद, चर्चासत्रे आयोजित करावेत. ८ मार्च या महिला दिनानिमित्त विशेष स्पर्धात्मक कार्यक्रम घ्यावेत. प्रदर्शनाच्या सुरुवातीला प्रवेशद्वारावर क्युआर कोडच्या माध्यमातून माहिती प्रदर्शित करावी.


श्री. सदाफुले आणि श्री. बेतीवार यांनी यावेळी संगणकीय सादरीकरण करुन सविस्तर माहिती दिली.

Comments
Add Comment

Dipali Sayyed On 'Raja Shivaji': ‘राजा शिवाजी’ पाहून दिपाली सय्यद यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, “... प्रत्येक व्यक्तीने चित्रपटगृहांत हा चित्रपट पहावा!”

मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख यांचा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट देशभरातील

'Raja Shivaji' Box Office Collection: 'राजा शिवाजी' चित्रपटाने घडवला इतिहास; पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन किती?

-शिवरायांचा पराक्रम पाहून प्रेक्षक भारावले मुंबई: १ मे २०२६ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या 'राजा शिवाजी' या

Arjun Tendulkar आयपीएल मधून OUT ! बीसीसीआयकडून मिळाली परवानगी, दुसऱ्या लीग मध्ये खेळणार,नेमकं चाललंय काय ?

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या खेळामुळे अनेकदा

Amruta Fadnavis New Song : अमृता फडणवीसांचे ‘नमन तुला’गाणे प्रदर्शित,गाण्यामध्ये लोकप्रिय अभिनेत्याचा खास कॅमिओ

१ मे महाराष्ट्र दिनी अमृता फडणवीसांचे 'नमन तुला'हे गाणे रिलीज झाले आहे.या गाण्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना

Bigg Boss Marathi Season 6 : ‘बिग बॉस मराठी सीझन ६’चा ग्रँड फिनाले ठरला २०२६ मधील सर्वाधिक रेटिंग मिळवणारा इव्हेंट!

मुंबई : एंडेमोल शाइन इंडिया आणि Banijay Entertainment यांच्या निर्मितीत तयार झालेला ‘बिग बॉस मराठी सीझन ६’ हा यंदाच्या

Heeramandi : भारतापासून जगापर्यंत: ‘हीरामंडी’च्या जागतिक यशाच्या २ वर्षांचा जल्लोष

- ‘हीरामंडी’ला २ वर्षे: संजय लीला भन्साळी यांनी भारतीय कथाकथनाला कशी दिली जागतिक ओळख मुंबई : मे २०२४ मध्ये