राम मंदिराच्या मुख्य पुजाऱ्याचे निधन

अयोध्या : श्रीराम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचे ८५ व्या वर्षी ब्रेन हॅमरेजमुळे निधन झाले. आचार्य सत्येंद्र दास यांना ब्रेन हॅमेरज ३ फेब्रुवारी रोजी झाले. तब्येत बिघडल्याचे लक्षात येताच त्यांना लखनऊच्या संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्स (एसजीपीजीआयएमएस) या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांनी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. आचार्य सत्येंद्र दास यांचे अंत्यसंस्कार अयोध्येत केले जातील. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्स पोस्ट करुन शोक व्यक्त केला आहे.





आचार्य सत्येंद्र दास यांच्यावर एसजीपीजीआयएमएसमध्ये न्यूरॉलॉजी विभागातील (वॉर्ड) हाय डिपेंडन्सी युनिट अर्थात एचडीयूमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती प्रदीप दास यांनी दिली. प्रदीप दास हे आचार्य सत्येंद्र दास यांचे शिष्य आहेत. प्रदीप दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, आचार्य सत्येंद्र दास यांनी बुधवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. सत्येंद्र दास यांच्या पार्थिवावर गुरुवार १३ फेब्रुवारी २०२५ रोजी अयोध्येत शरयू नदीकिनारी अंत्यसंस्कार केले जातील. काही दिवसांपूर्वी एसजीपीजीआयएमएस रुग्णालयाने काढलेल्या एका मेडिकल बुलेटिनमध्ये आचार्य सत्येंद्र दास यांना रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास आहे असल्याचाही उल्लेख होता.



कोण आहेत आचार्य सत्येंद्र दास ?

आचार्य सत्येंद्र दास ३३ वर्षांपासून राम मंदिराच्या सेवेत होते. ते दररोज प्रभूरामाच्या मूर्तीची पूजा करत होते. तत्कालीन खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषदेचे तत्कालीन प्रमुख अशोक सिंघल या दोघांनी पाठिंबा दिला आणि १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची राम मंदिरात मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती झाली होती. सत्येंद्र दास यांनी १९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य ही पदवी घेतली होती. ते काही काळ एका महाविद्यालयात संस्कृत व्याकरणाचे सहायक अध्यापक (सहायक शिक्षक) होते.
Comments
Add Comment

सिगारेट, पान मसाला महागणार!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतेच लोकसभेत 'आरोग्य सुरक्षेपासून राष्ट्रीय सुरक्षा

इंडिगोचा सावळा गोंधळ, नागपूरहून पुण्यासाठी निघालेले प्रवासी हैदराबादला पोहोचले

नागपूर : इंडिगो विमानांच्या बिघडण्याचे, अपघात होण्याचे आणि क्रू मेम्बर्सच्या सावळ्या गोंधळाचे सत्र हे अजूनही

मोदी पुतिन बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे आणि भारत आणि रशिया दरम्यानच्या करारांची यादी जाणून घ्या एका क्लिकवर...

नवी दिल्ली : भारत आणि रशिया यांच्यातील धोरणात्मक मैत्रीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या आणि दिल्लीत होत असलेल्या २३

जहाज उद्योग, वाहतूक, आरोग्य, संरक्षण, आर्थिक क्षेत्रात भारत आणि रशिया दरम्यान करार, मोदी - पुतिन चर्चेतील पाच महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन मोठ्या शिष्टमंडळासह भारत दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात रशिया आणि भारत

रशियन रुबेल आणि रशियन रुबेल मध्ये कितीचे अंतर?

नवी दिल्ली: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन काल (४ डिसेंबर) भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पुतिन यांचा हा

'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा उपकर २०२५' विधेयक मंजूर झाल्यास काय बदल होणार? जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी 'आरोग्य सुरक्षा आणि राष्ट्रीय