मुंबई पुणे एक्स्प्रेस वेच्या मिसिंग लिंकचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार

मुंबई : मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावरील 'मिसिंग लिंक'चे काम ऑगस्ट २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी दिले. काम वेळेत पूर्ण करताना हा प्रकल्प दर्जेदार व्हावा याची खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मिसिंग लिंक प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर राज्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास 'मिसिंग लिंक' कार्यरत झाल्यावर प्रवास आणखी वेगवान, आरामदायी, सुरक्षित, सोयीचा होईल; असा विश्वास राज्यमंत्र्यांनी व्यक्त केला.



'मिसिंग लिंक' अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज आणि खोपोली एग्झिट ते कुसगाव (सिंहगड संस्था) दरम्यानचा भाग येतो. यामुळे सध्याचे १९ किमीचे अंतर सहा किमीने कमी होऊन १३.३ किमी इतके होणार आहे. यातून प्रवासाच्या वेळेत २०-२५ मिनिटांची बचत, इंधन बचत, वायु प्रदूषणात घट, घाट रस्त्यावरील वाहतूक कोंडी तसेच अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे. बोरघाटातील वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे.



पुणे शहरातील वर्दळीच्या ३२ रस्त्यांवरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून ३२ रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांवरील सर्व अडथळे आणि अनधिकृत बांधकामं हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५ आणि दुसऱ्या टप्प्यात १७ रस्त्यांचे काम होणार आहे. सासवड रस्ता, कात्रज-मंतरवाडी बायपास, जुना विमानतळ रस्ता, आळंदी रस्ता, पुणे-मुंबई जुना रस्ता, शास्त्री रस्ता, नेहरू रस्ता, टिळक रस्ता, साधू वासवानी रस्ता, बंडगार्डन रस्ता, डॉ. आंबेडकर रस्ता, महात्मा गांधी रस्ता (एमजी रोड), प्रिन्स ऑफ वेल्स रस्ता, कोंढवा मुख्य रस्ता, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता, सेनापती बापट रस्ता यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांवरील सर्व अडथळे आणि अनधिकृत बांधकामं हटवून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जातील.
Comments
Add Comment

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच

Minister Nitesh Rane : राज्यातील जलवाहतूक सेवा होणार डिजिटल

 मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; ऑनलाईन तिकीट व्यवस्थेची अंमलबजावणी करणार मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील