MahaKumbh Mela : प्रयागराजमध्ये ‘नो-व्हेईकल झोन' घोषित! माघी पौर्णिमेच्या स्नानासाठी 'अशी' असेल व्यवस्था

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे महाकुंभमेळ्यात भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. अशातच आता माघी पौर्णिमेच्या प्रार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात (MahaKumbh Mela) भाविकांची होणारी मोठी गर्दी पाहता उत्तर प्रदेश सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने १२ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये वाहनांना बंदी घातली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आता केवळ कुंभमेळा परिसरातच नव्हे, तर संपूर्ण प्रयागराज शहरात वाहनबंदी करण्यात करण्यात आली आहे, कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. (MahaKumbh Mela)



संपूर्ण शहरात नो-व्हेईकल झोन


महाकुंभमेळा क्षेत्रच नव्हे, तर संपूर्ण प्रयागराज शहर १२ फेब्रुवारीपर्यंत नो-व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाविकांच्या वाहनांनाही आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्नानासाठी आलेल्या लाखो भाविकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.



केवळ प्रशासनाच्या वाहनांना परवानगी


उत्तर प्रदेश सरकारच्या नव्या आदेशानुसार, केवळ अधिकाऱ्यांची आणि आरोग्य विभागाच्या वाहनांना प्रगायगराजमध्ये परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, व्हीव्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही खास व्यक्तीसाठी नियम शिथिल केले जाणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रयागराजला येणाऱ्या भाविकांना स्वतःची वाहने शहराबाहेरील पार्किंगमध्ये ठेवावी लागणार आहेत. तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना रेल्वे स्थानकावर उतरून पायी संगमपर्यंत जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ८ ते १० किमीची पायी यात्रा करावी लागण्याची शक्यता आहे.



अक्षयवटसह लेटे हनुमान मंदिर बंद


माघी पौर्णिमेच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. १२ फेब्रुवारीपर्यंत ही दोन्ही मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या नव्या निर्बंधांमुळे भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

भारत-पाकिस्तान संघर्षामधील मध्यस्थीचा आणखी एक दावेदार, चीनचा दावा भारताने फेटाळला

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत

ओडिशाच्या किनाऱ्यावरून एकाच लाँचरमधून लागोपाठ दोन प्रलय क्षेपणास्त्रांचे यशस्वी प्रक्षेपण

हैद्राबाद : संरक्षण क्षेत्रात भारताने आणखी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच