MahaKumbh Mela : प्रयागराजमध्ये ‘नो-व्हेईकल झोन' घोषित! माघी पौर्णिमेच्या स्नानासाठी 'अशी' असेल व्यवस्था

नवी दिल्ली : प्रयागराजमध्ये गेल्या दोन दिवसांपूर्वी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यामुळे महाकुंभमेळ्यात भाविकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो आहे. अशातच आता माघी पौर्णिमेच्या प्रार्श्वभूमीवर कुंभमेळ्यात (MahaKumbh Mela) भाविकांची होणारी मोठी गर्दी पाहता उत्तर प्रदेश सरकारने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश सरकारने १२ फेब्रुवारीपर्यंत प्रयागराजमध्ये वाहनांना बंदी घातली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आता केवळ कुंभमेळा परिसरातच नव्हे, तर संपूर्ण प्रयागराज शहरात वाहनबंदी करण्यात करण्यात आली आहे, कोणत्याही परिस्थितीत वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. (MahaKumbh Mela)



संपूर्ण शहरात नो-व्हेईकल झोन


महाकुंभमेळा क्षेत्रच नव्हे, तर संपूर्ण प्रयागराज शहर १२ फेब्रुवारीपर्यंत नो-व्हेईकल झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. भाविकांच्या वाहनांनाही आत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्नानासाठी आलेल्या लाखो भाविकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.



केवळ प्रशासनाच्या वाहनांना परवानगी


उत्तर प्रदेश सरकारच्या नव्या आदेशानुसार, केवळ अधिकाऱ्यांची आणि आरोग्य विभागाच्या वाहनांना प्रगायगराजमध्ये परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे, व्हीव्हीआयपी पासही रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे कोणत्याही खास व्यक्तीसाठी नियम शिथिल केले जाणार नसल्याचे सरकारने म्हटले आहे. प्रयागराजला येणाऱ्या भाविकांना स्वतःची वाहने शहराबाहेरील पार्किंगमध्ये ठेवावी लागणार आहेत. तसेच ट्रेनने प्रवास करणाऱ्यांना रेल्वे स्थानकावर उतरून पायी संगमपर्यंत जावे लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांना ८ ते १० किमीची पायी यात्रा करावी लागण्याची शक्यता आहे.



अक्षयवटसह लेटे हनुमान मंदिर बंद


माघी पौर्णिमेच्या दिवशी भाविक मोठ्या संख्येने अक्षयवट आणि लेटे हनुमान मंदिरात दर्शनासाठी जातात. १२ फेब्रुवारीपर्यंत ही दोन्ही मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या नव्या निर्बंधांमुळे भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव