Mahakumbh Accident : काळाचा घाला! कुंभमेळ्याहून परतताना बसची ट्रकला जोरदार धडक

७ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी


जबलपूर : महाकुंभमेळ्याहून परतताना भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक (Mahakumbh Accident) झाली. या धडकेत बसचा चक्काचूर झाला असून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३०वर हा अपघात झाला. कुंभमेळ्याहून परतलेल्या भाविकांची बस बर्गी गावादरम्यान पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांचे पथक दाखल झाले असून ताताडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. तर बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सिमेंटने भरलेला एक ट्रक विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये बसच्या काही भागाचे तुकडे झाल्याचे दिसत आहे. तसेच स्थानिक लोक ट्रकच्या छतावर चढून प्रवांशाची मदत करत आहेत. घटनास्थळी क्रेन देखील पोहोचली आहे. या अपघातात आणखी कुणी बसमध्ये अडकले आहेत का? याचा तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

यंदाच्या दिवाळीत स्वदेशी वस्तूंची मागणी वाढली

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशी वस्तू खरेदी करण्याचे केलेले आवाहन प्रभावी ठरत आहे. करवा चौथ, दिवाळी

करूर चेंगराचेंगरी प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाचा १३ ऑक्टोबरला निर्णय

चेन्नई : करूर येथील चेंगराचेंगरीच्या घटनेच्या स्वतंत्र चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकांवर १३ ऑक्टोबर रोजी

सर्वसामान्यांसाठी नवा परवडणारा 5G स्मार्टफोन, सॅमसंग गॅलेक्सी M17 5G

सॅमसंग गॅलेक्सी M17 5G फक्त ₹12,499 पासून, दमदार फीचर्स आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स  मुंबई : सॅमसंगने भारतात आपला

अतिरेक्यांना पकडण्याची ती पद्धत चुकली, चिदंबरम यांचे धक्कादायक वक्तव्य

नवी दिल्ली : अतिरेकी भिंद्रनवाला आणि समर्थक शस्त्रसाठा घेऊन शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरात लपले होते. या

Diwali 2025 : Elite Marque कंपनीने कर्मचाऱ्यांना दिली सलग ९ दिवसांची सुट्टी !

दिवाळीत ईमेल बंद ठेवा, मिठाई खा आणि निवांत झोपा – सीईओ रजत ग्रोवर यांचा सल्ला नवी दिल्ली : दिवाळीच्या सणाला बहुतेक

भारत - बांगलादेश सीमेवर बीएसएफची मोठी कारवाई, २० किलो सोनं जप्त !

नवी दिल्ली : भारत - बांगलादेश सीमेलगत वाढत्या तस्करीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीमा सुरक्षा दल (BSF) तैनात