Mahakumbh Accident : काळाचा घाला! कुंभमेळ्याहून परतताना बसची ट्रकला जोरदार धडक

७ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी


जबलपूर : महाकुंभमेळ्याहून परतताना भाविकांच्या बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. मध्यप्रदेशातील जबलपूरमधील सिहोराजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर जोरदार धडक (Mahakumbh Accident) झाली. या धडकेत बसचा चक्काचूर झाला असून ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग ३०वर हा अपघात झाला. कुंभमेळ्याहून परतलेल्या भाविकांची बस बर्गी गावादरम्यान पोहोचताच समोरून येणाऱ्या ट्रकला धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी प्रशासन आणि पोलिसांचे पथक दाखल झाले असून ताताडीने बचावकार्य सुरु करण्यात आले. तर बसमध्ये अजूनही काही प्रवासी अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेवेळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सिमेंटने भरलेला एक ट्रक विरुद्ध दिशेने येत असल्यामुळे हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.


दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामध्ये बसच्या काही भागाचे तुकडे झाल्याचे दिसत आहे. तसेच स्थानिक लोक ट्रकच्या छतावर चढून प्रवांशाची मदत करत आहेत. घटनास्थळी क्रेन देखील पोहोचली आहे. या अपघातात आणखी कुणी बसमध्ये अडकले आहेत का? याचा तपास सुरू आहे.


Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला