Beer Price Hike : तळीरामांची पार्टी महागली! बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ

  219

नवी दिल्ली : दारूचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण तरीही लोक नशा करण्यासाठी ते पितात. मात्र तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तेलंगणा हे दक्षिण भारतातील बिअरच्या सेवनासाठी सर्वात महागडे राज्य बनले आहे. परंतु तेलंगणातील बिअरप्रेमींना सरकारने (Telangana Govrnment) मोठा झटका दिला आहे. तेलंगणामध्ये बिअरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता बिअरसाठी अधिकचे पैसे खर्च (Beer Price Hike) करावे लागणार आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निर्देशात तेलंगणाचे प्रधान सचिव (महसूल) एस.ए.एम रिझवी यांनी तेलंगणा बेव्हरेजेस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना किंमत समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश दिले. निवृत्त न्यायमूर्ती जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील समितीने बिअरच्या किमतीत १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्याला मंजुरी दिल्यानंतर सरकारने सुधारित बीअर एमआरपी मंगळवारपासून लागू केली आहे.


त्यानुसार, राज्यात बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढल्याने नियमित ६५० मिली बिअरच्या बाटलीची किंमत ब्रँडनुसार १७०-१८० रुपये असण्याची शक्यता आहे. सुधारित किंमती सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत येतात, ज्याचा उद्देश मद्यविक्रीतून महसूल वाढवण्याचा आहे. (Beer Price Hike)

Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )