Beer Price Hike : तळीरामांची पार्टी महागली! बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : दारूचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण तरीही लोक नशा करण्यासाठी ते पितात. मात्र तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तेलंगणा हे दक्षिण भारतातील बिअरच्या सेवनासाठी सर्वात महागडे राज्य बनले आहे. परंतु तेलंगणातील बिअरप्रेमींना सरकारने (Telangana Govrnment) मोठा झटका दिला आहे. तेलंगणामध्ये बिअरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता बिअरसाठी अधिकचे पैसे खर्च (Beer Price Hike) करावे लागणार आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निर्देशात तेलंगणाचे प्रधान सचिव (महसूल) एस.ए.एम रिझवी यांनी तेलंगणा बेव्हरेजेस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना किंमत समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश दिले. निवृत्त न्यायमूर्ती जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील समितीने बिअरच्या किमतीत १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्याला मंजुरी दिल्यानंतर सरकारने सुधारित बीअर एमआरपी मंगळवारपासून लागू केली आहे.


त्यानुसार, राज्यात बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढल्याने नियमित ६५० मिली बिअरच्या बाटलीची किंमत ब्रँडनुसार १७०-१८० रुपये असण्याची शक्यता आहे. सुधारित किंमती सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत येतात, ज्याचा उद्देश मद्यविक्रीतून महसूल वाढवण्याचा आहे. (Beer Price Hike)

Comments
Add Comment

लालूंच्या निवासस्थांनी उमेदवारीवरुन गोंधळ

पाटणा : बिहारमधील विधानसभेची निवडणूक अगदी जवळ आली आहे. इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक तिकीट पक्के करण्यासाठी

आकाशात 'या' दिवशी दिसणार नेहमीपेक्षा मोठा आणि तेजस्वी चंद्र

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काही आठवड्यांपूर्वी भारतासह जगभरात 'ब्लड मून' दिसल्यानंतर, आता पुन्हा एकदा आकाशात एका

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन