Beer Price Hike : तळीरामांची पार्टी महागली! बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : दारूचे सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे, पण तरीही लोक नशा करण्यासाठी ते पितात. मात्र तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. तेलंगणा हे दक्षिण भारतातील बिअरच्या सेवनासाठी सर्वात महागडे राज्य बनले आहे. परंतु तेलंगणातील बिअरप्रेमींना सरकारने (Telangana Govrnment) मोठा झटका दिला आहे. तेलंगणामध्ये बिअरच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे मद्यप्रेमींना आता बिअरसाठी अधिकचे पैसे खर्च (Beer Price Hike) करावे लागणार आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री उशिरा जारी केलेल्या निर्देशात तेलंगणाचे प्रधान सचिव (महसूल) एस.ए.एम रिझवी यांनी तेलंगणा बेव्हरेजेस कॉर्पोरेशन लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकांना किंमत समितीच्या शिफारशी लागू करण्याचे निर्देश दिले. निवृत्त न्यायमूर्ती जयस्वाल यांच्या नेतृत्वाखालील समितीने बिअरच्या किमतीत १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव दिला होता आणि त्याला मंजुरी दिल्यानंतर सरकारने सुधारित बीअर एमआरपी मंगळवारपासून लागू केली आहे.


त्यानुसार, राज्यात बिअरच्या किंमतीत १५ टक्क्यांनी वाढल्याने नियमित ६५० मिली बिअरच्या बाटलीची किंमत ब्रँडनुसार १७०-१८० रुपये असण्याची शक्यता आहे. सुधारित किंमती सरकारच्या नवीन उत्पादन शुल्क धोरणांतर्गत येतात, ज्याचा उद्देश मद्यविक्रीतून महसूल वाढवण्याचा आहे. (Beer Price Hike)

Comments
Add Comment

माजी सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाला चोप! समाज माध्यमांवर व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली: देशाचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीशपदावर असताना त्यांच्यावर भर सुनावणी दरम्यान बुट फेकून

भारताच्या विकासात वाढणार एआयचा वेग; मायक्रोसॉफ्टने भारतात केली तब्बल १७.५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक!

नवी दिल्ली: जगावर सध्या एआयची भूरळ आहे. भविष्यातही असंख्य गोष्टी एआयमुळे नष्ट होणार आहेत असा अंदाजही आतापासून

अवघ्या २० मिनिटांत अब्जाधीश झाला, असं काय घडलं त्या भारतीय माणसासोबत ?

नवी दिल्ली : प्रत्येक माणसाच्या आयुष्यात आलेला आनंदाचा क्षण कधी दुःखात आणि संकटात बदलेल हे सांगता येत नाही . एका

राज्यसभेत 'वंदे मातरम'वर बोलले अमित शाह, त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे १० मुद्द

  नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी राज्यसभेत वंदे मातरमवर चर्चा सुरू केली. त्यांनी हे

वंदे मातरम् ही पवित्र प्रतिज्ञा : पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : वंदे मातरम् हे केवळ राजकीय संघर्षाचे घोषवाक्य नव्हते, तर भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याची

गोवा क्लब अग्निकांडातील मुख्य आरोपींनी ठोकली परदेशात धूम!

गोवा: गोव्यातील बर्च बाय रोमियो लेन क्लब अग्निकांड प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे क्लबचे मालक सौरभ आणि गौरव