घर, प्लॉट घेण्याचा विचार करताय? एप्रिलपूर्वी करा व्यवहार नाहीतर...

मुंबई: राज्य सरकारने १ एप्रिलपासून रेडिरेकनर दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही मालमतेची म्हणजेच प्रॉपर्टीची ठरविण्यात आलेली मूळ किंमत म्हणजेच रेडिरेकनर दर होय. हे दर आता वाढविले जाणार असल्यामुळे घर, प्लॉट अथवा इतर मालमत्ता खरेदी करावयाच्या विचारात असाल तर एप्रिलपूर्वी व्यवहार केल्यास फायद्याचे ठरू शकते.


रेडिरेकनर हे घराच्या, जमिनीच्या किंवा व्यावसायिक वापरासाठीच्या जागांचे प्रमाण दर असतात. हे दर तिथल्या परिसरानुसार आणि राहणीमानानुसार वेगवेगळे असतात. अर्थव्यवस्था, मागणी व पुरवठा यांची स्थिती पाहून दर ठरविले जातात. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरापेक्षा कमी दरात घर, जमीन व इतर मालमत्ता खरेदी केली तरी सरकारी दरानुसारच नोंदणी शुल्क आकारले जाते. त्याशिवाय आपला दस्त रजिस्टर होत नाही. त्यामुळे नियमानुसारच खरेदी करण्याची गरज असते.



रेडिरेकनरचे दर वाढल्यास मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्कासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचे स्वप्न आणखी महागणार आहे.साधारणपणे आकारणी किंमत भागिले क्षेत्रफळ म्हणजेच रेडिरेकनर दर म्हटले जाते. सध्या ग्रामीण भागासाठी व्हॅल्युएशनच्या पाच टक्के, तर शहरी भागासाठी ६ टक्के रेडिरेकनरचा दर आकारला जात आहे.आपण जो प्लॉट विकत घेणार आहोत, त्या प्लॉटच्या किमतीत रेडिरेकनरनुसार जी वाढ होणार आहे, त्या किमतीत रेडिरेकनर दरानुसार साधारणतः १० टक्के वाढ अपेक्षित आहे.



एप्रिलआधी फायदा


दर वाढण्यापूर्वी म्हणजे एप्रिलआधी बुकिंग करून चलान भरल्यास रेडिरेकनरचे जुनेच दर लागेल. त्यासाठी चार महिन्यांच्या आत खरेदी-विक्री व्यवहार करणे आवश्यक आहे. एप्रिलनंतर वाढीव दर लागणार आहेत.

Comments
Add Comment

बोरिवलीत २१ वर्षीय तरुणी ‘अ‍ॅग्रीमेंट रिलेशनशिप’ मध्ये; कुटुंबाची विश्व हिंदू परिषदेकडे धाव

मुंबई : मुंबईतील बोरिवली परिसरात एका २१ वर्षीय तरुणीने लग्न न करता एका मुस्लिम तरुणासोबत ‘लिव्ह-इन रिलेशनशिप

राज्यामध्ये दरदिवशी ६१ बालकांवर अत्याचार

मुंबई : राज्यात बालकांवर होत असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यांचा आलेख चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. राष्ट्रीय

दहावी परीक्षेच्या अर्ज भरण्याची मुदतवाढ; जाणून घ्या, आता किती दिवस मिळणार अतिरिक्त संधी

10th SSC Board Exam 2026 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या

विरार ते थेट मरीन ड्राइव्हपर्यंतचा प्रवास होणार सिग्नल-फ्री

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार मुंबई : उत्तन-वसई-विरार सी लिंक प्रकल्पाला अखेर पर्यावरण विभागाने अंतिम मान्यता

महापालिकेच्या चार रुग्णालयांची ऑक्सिजन लेव्हल वाढणार, कोविड काळातील त्या...

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेच्यावतीने कोविड काळात निर्माण केलेल्या कोविड सेंटरमधील ऑक्सिजन टाक्यांचा

कार्तिकी यात्रेसाठी जादा ११५० एसटी बस सोडणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई (प्रतिनिधी): बंदा क्षेत्र पंढरपूर येथे २ नोव्हेंबर रोजी संपन्न होणाऱ्या कार्तिकी एकादशी यात्रेसाठी भाविक