घर, प्लॉट घेण्याचा विचार करताय? एप्रिलपूर्वी करा व्यवहार नाहीतर...

  364

मुंबई: राज्य सरकारने १ एप्रिलपासून रेडिरेकनर दरात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही मालमतेची म्हणजेच प्रॉपर्टीची ठरविण्यात आलेली मूळ किंमत म्हणजेच रेडिरेकनर दर होय. हे दर आता वाढविले जाणार असल्यामुळे घर, प्लॉट अथवा इतर मालमत्ता खरेदी करावयाच्या विचारात असाल तर एप्रिलपूर्वी व्यवहार केल्यास फायद्याचे ठरू शकते.


रेडिरेकनर हे घराच्या, जमिनीच्या किंवा व्यावसायिक वापरासाठीच्या जागांचे प्रमाण दर असतात. हे दर तिथल्या परिसरानुसार आणि राहणीमानानुसार वेगवेगळे असतात. अर्थव्यवस्था, मागणी व पुरवठा यांची स्थिती पाहून दर ठरविले जातात. राज्य सरकारने ठरवून दिलेल्या रेडिरेकनर दरापेक्षा कमी दरात घर, जमीन व इतर मालमत्ता खरेदी केली तरी सरकारी दरानुसारच नोंदणी शुल्क आकारले जाते. त्याशिवाय आपला दस्त रजिस्टर होत नाही. त्यामुळे नियमानुसारच खरेदी करण्याची गरज असते.



रेडिरेकनरचे दर वाढल्यास मालमत्ता खरेदी करताना मुद्रांक शुल्कासाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे घर खरेदी करण्याचे स्वप्न आणखी महागणार आहे.साधारणपणे आकारणी किंमत भागिले क्षेत्रफळ म्हणजेच रेडिरेकनर दर म्हटले जाते. सध्या ग्रामीण भागासाठी व्हॅल्युएशनच्या पाच टक्के, तर शहरी भागासाठी ६ टक्के रेडिरेकनरचा दर आकारला जात आहे.आपण जो प्लॉट विकत घेणार आहोत, त्या प्लॉटच्या किमतीत रेडिरेकनरनुसार जी वाढ होणार आहे, त्या किमतीत रेडिरेकनर दरानुसार साधारणतः १० टक्के वाढ अपेक्षित आहे.



एप्रिलआधी फायदा


दर वाढण्यापूर्वी म्हणजे एप्रिलआधी बुकिंग करून चलान भरल्यास रेडिरेकनरचे जुनेच दर लागेल. त्यासाठी चार महिन्यांच्या आत खरेदी-विक्री व्यवहार करणे आवश्यक आहे. एप्रिलनंतर वाढीव दर लागणार आहेत.

Comments
Add Comment

नारायण राणे यांचे उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ले

नारायण राणे यांचे धक्कादायक विधान मुंबई : खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी

“पक्षाने माझ्यावर उपकार केलेत” - रविंद्र चव्हाण

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यावर व्यक्त केले मनोगत मुंबई : अतिशय सामान्य कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या

बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार

मुंबई : बीड येथील अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन

अधिक व्याजाचे आमिष देणाऱ्या योजनांविरोधात पोलिसांची विशेष मोहीम

मुंबई : राज्यात अधिक व्याजदराचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी

अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतात महाराष्ट्राची भरारी

सहकारातून प्रथमच पंपस्टोरेज प्रकल्प; १००८ कोटी रुपये गुंतवणूक, २४० मेगावॉट वीजनिर्मिती मुंबई : महाराष्ट्राने

मोठी बातमी! पंढरपूर आषाढी वारीदरम्यान अपघात किंवा मृत्यू झाल्यास सरकार देणार ४ लाखांची मदत

मुंबई : महाराष्ट्राचा आध्यात्मिक उत्सव मानला जाणारा पंढरपूर आषाढी वारी सोहळा सध्या उत्साहात सुरू आहे. अशातच आता