महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा, अभिजित बांगर यांच्या बदलीची हवा

  1271

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची बदली होण्याची चर्चा महापालिका वर्तुळात जोरात सुरु असून लवकरच या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली होवून त्याऐवजी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी होणार असल्याचे बोलले जात आहे.


मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांनी २१ मार्च २०२४ रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्याकडे महापालिकेच्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख असल्याने त्यांची वर्णी महापालिकेत लागली आणि सेवा ज्येष्ठता नसतानाही त्यांच्याकडे प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच डॉ सुधाकर शिंदे यांची बदली झाल्यानंतर या रिक्त जागी डॉ विपीन शर्मा यांची वर्णी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी लागली. त्यामुळे त्यांच्याकडे पश्चिम उपनगरे आणि त्याअंतर्गत् आरोग्य विभागाचा पदभार सोपवण्यात आला.



परंतु हे दोन्ही अधिकारी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील असल्याने त्यांची आता महापालिकेतून उचलबांगडी केली जाण्याची शक्यता असून तशी त्यांच्या बदलीची चर्चा महापालिका तसेच मंत्रालयात ऐकायला मिळत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अनेक सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट होत असून त्याअंतर्गत महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीची हवा सध्या जोरात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या दोघांच्या बदलीचे आदेश मिळतील असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

डॉक्टरांपेक्षा एक रुपया अधिक पगार पाहिजे; आत्मसन्मानासाठी मुंबईचे 'सफाई कर्मचारी' सरसावले!

मुंबई : मुंबईसारख्या महानगरात स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेतलेले मनपाचे सफाई कर्मचारी आता केवळ झाडू न मारता,

Kabutar Khana : "कबुतरप्रेमींना मोठा धक्का! दाणापाण्यावर बंदी कायम; कोर्टाचा स्पष्ट आदेश"

मुंबई : मुंबईतील दादर येथील प्रसिद्ध कबुतरखाना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

Gadchiroli Accident News : रस्त्यावर व्यायाम करत होते अन् भरधाव ट्रकनं चिरडलं; गडचिरोलीत ६ मुले ट्रकखाली, चौघांचा जागीच मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला. गडचिरोली-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर

बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा प्रश्न चर्चेतून सोडवणार

मुंबई : बेस्टच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष द्या आणि युनियनशी चर्चा करुन तोडगा

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे चालवणार १८ विशेष रेल्वेसेवा

रक्षाबंधनाच्या दिवशीही सुविधा मुंबई : रक्षाबंधन आणि स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लांब

पाणंद रस्त्यांना अडथळा आणाल तर...

मुंबई : राज्यातील शेत आणि पाणंद रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी एक समग्र आणि ठोस योजना सप्टेंबर महिन्याच्या