महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ विपीन शर्मा, अभिजित बांगर यांच्या बदलीची हवा

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर आणि अतिरिक्त आयुक्त विपीन शर्मा यांची बदली होण्याची चर्चा महापालिका वर्तुळात जोरात सुरु असून लवकरच या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली होवून त्याऐवजी नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती महापालिकेत अतिरिक्त आयुक्त पदी होणार असल्याचे बोलले जात आहे.


मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून अभिजित बांगर यांनी २१ मार्च २०२४ रोजी पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांच्याकडे महापालिकेच्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू अशी त्यांची ओळख असल्याने त्यांची वर्णी महापालिकेत लागली आणि सेवा ज्येष्ठता नसतानाही त्यांच्याकडे प्रकल्प विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. तसेच डॉ सुधाकर शिंदे यांची बदली झाल्यानंतर या रिक्त जागी डॉ विपीन शर्मा यांची वर्णी महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी लागली. त्यामुळे त्यांच्याकडे पश्चिम उपनगरे आणि त्याअंतर्गत् आरोग्य विभागाचा पदभार सोपवण्यात आला.



परंतु हे दोन्ही अधिकारी तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विश्वासातील असल्याने त्यांची आता महापालिकेतून उचलबांगडी केली जाण्याची शक्यता असून तशी त्यांच्या बदलीची चर्चा महापालिका तसेच मंत्रालयात ऐकायला मिळत आहे. राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर अनेक सनदी अधिकाऱ्यांची खांदेपालट होत असून त्याअंतर्गत महापालिकेतील दोन अतिरिक्त आयुक्तांच्या बदलीची हवा सध्या जोरात ऐकायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये या दोघांच्या बदलीचे आदेश मिळतील असे बोलले जात आहे.

Comments
Add Comment

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मंगळवारी 'या' भागात होणार पाणी कपात

मुंबई: मुंबईकरांसाठी फार महत्वाची बातमी समोर आली आहे. मंगळवार १० फेब्रुवारी रोजी मुंबईमधल्या अनेक ठिकाणी पाणी

रितू तावडे मुंबईच्या आठव्या महिला महापौर

मुंबई: मुंबई महापालिकेच्या इतिहासात १९५५ पासून ते २०१७ या कालावधीत ७ महिला नगरसेविका महापौर झाल्या आहेत. १९५५ -५६

अजित पवारांचे विमान लँड करण्याचा निर्णय वैमानिकाचा, की कोणी ‘कमांड’ दिली?

 तपासात नवा ट्वीस्ट; दृष्यमानता कमी असतानाही परवानगी कशी मिळाली, या दिशेने तपास सुरू मुंबई : राज्याचे दिवंगत

Mumbai Local : पहिला बुरखा परिधान करून महिलांच्या डब्यात प्रवेश, नंतर अनेकींना घाणेरडा स्पर्श अन् संशय येताच चालत्या ट्रेनमधून पसार!

मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर झाला आहे. एका धावत्या

काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे देशाचे विभाजन

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; गडचिरोलीत सात नक्षलवाद्यांचा खात्मा मुंबई : “काँग्रेसच्या

Pune: दहावी-बारावी परीक्षेआधी पुणे प्रशासन ॲक्शन मोडवर; नियमांचे पालन न केल्यास होणार कडक कारवाई

पुणे: पुढील काही दिवसांमध्ये राज्यात सर्वत्र परीक्षांचे वारे वाहू लागणार आहेत. बारावीच्या परीक्षा १०